‘पाकने पोरखेळ थांबवला नाही, तर त्याचे १० तुकडे करू’, म्हणणारे
गृहमंत्री राजनाथ सिंह यांना हुतात्मा सैनिक दिसत नाहीत का ?
नवी देहली - जम्मू-कश्मीरमध्ये या वर्षात आतापर्यंत आतंकवाद्यांच्या आक्रमणात ८७ सैनिक हुतात्मा झाले आहेत. यात ८१ सैनिक, तर ६ अधिकारी यांचा समावेश आहे. १. काश्मिरात २००८ नंतर २०१६ मध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात उरी येथील सैन्याच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात १९ सैनिक हुतात्मा झाले होते.
२. २००८ मध्ये ९० सैनिक हुतात्मा झाले होते. २००९ मध्ये ७८, २०१० मध्ये ६७, २०११ मध्ये ३० सैनिक हुतात्मा झाले. २०१२ मध्ये सुरक्षा दलाचे १७ सैनिक हुतात्मा झाले. २०१३ मध्ये ६२, २०१४ मध्ये ५१ आणि २०१५ मध्ये ४१ सैनिक हुतात्मा झाले. (२००८ ते २०१४ पर्यंत काँग्रेसचे सरकार होते आणि तेव्हाही आतंकवाद्यांच्या आक्रमणात सैनिक हुतात्मा होत होते आणि आता काँग्रेसचे सरकार नसतांनाही सैनिक तसेच हुतात्मा होत आहेत, ही स्थिती कोणतेही सरकार आले, तरी पालटत नसल्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही, हेच दर्शवते ! - संपादक)