'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

गोध्रा हत्याकांड : हिंदूंच्या दृष्टीकोनातून...

      गोध्रा हत्याकांडाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ सर्वच वृत्तपत्रे, वृत्तसंकेतस्थळे यांनी त्यांची बौद्धिक क्षमता वापरून या प्रसंगाला उजाळा दिला. प्रसारमाध्यमांची बौद्धिक क्षमता ही मुसलमानांचे हित जपण्यात आणि हिंदूंच्या भावना पायदळी तुडवण्यासाठीच वापरली जाते, हे वेगळे सांगायला नको. विविध वृत्तसंकेतस्थळांवर ‘गुजरातमधील मुसलमानांनी घेतला आंध्रप्रदेशमध्ये आसरा’, ‘गुजरात दंगलीचे भूत अजूनही मोदींच्या मानगुटीवर’, ‘दहा वर्षांनंतरही पीडितांच्या (अर्थातच मुसलमानांच्या !) मनातील भीती आणि उद्विग्नता कायम’, अशा आशयाची वृत्ते प्रसिद्ध झाली होती.
एकंदरित गोध्रा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी जे काही लेख, अनुभव लिहिले अथवा प्रसारित केले, त्यातून हिरवा रंगच उधळला गेला. गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींचे मूळ कारण हे गोध्रा हत्याकांड होते; मात्र गुजरात दंगलींविषयी जेवढे बोलले जाते, तेवढे गोध्रा हत्याकांडाविषयी बोलले अथवा लिहिले जात नाही. गोध्रा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ‘सीएन्एन् आयबीएन्’ या वृत्तवाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई यांनी गुजरातमध्ये जाऊन तेथील पीडितांच्या (अर्थातच मुसलमानांच्या !) व्यथा (?) जाणून घेतल्या. गोध्रा परिसरातील मुसलमानांकडे कसे संशयाने पाहिले जाते, त्यांना नोकर्‍या मिळत नाहीत, यांविषयी मुसलमानांनी सांगितलेले अनुभव वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आले. या पूर्ण कार्यक्रमात, तसेच वृत्तसंकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये अव्यक्तपणे; मात्र जाणीवपूर्वक अन् पद्धतशीरपणे हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. अलीकडच्या काळात भारतातच काय जागतिक स्तरावरही अमानुषपणे आणि माणूसकीला काळिमा फासणारे असे हत्याकांड घडलेले नाही. गोध्रा हत्याकांड घडवून मुसलमानांनी दाखवलेले क्रौर्य, पाशवी वृत्ती यांकडे प्रसारमाध्यमांनी नेहमीच कानाडोळा केला. गोध्रा हत्याकांडानंतर प्रसारमाध्यमांनी दहा वर्षांपूर्वी जी हिंदुविरोधी भूमिका घेतली होती, ती आजही तशीच आहे.
गोध्रा हत्याकांड पुन्हा घडू नये, यासाठी ...!
    मागील कित्येक वर्षे हिंदु-मुसलमान दंगली झाल्या नाहीत का ? बंगालमध्ये तर सशस्त्र मुसलमान हिंदूंच्या जिवावर उठले आहेत. महाराष्ट्रातील अचलपूर, राबोडी, धुळे येथील दंगली हिंदू विसरलेले नाहीत. कर्नाटक, केरळ या राज्यांमध्येही दंगली घडत असतात; मात्र त्यांची चर्चा का होत नाही ? याचे उत्तर सोपे आहे. या ठिकाणी मार खाणारे हिंदू असतात, तर मार देणारे मुसलमान ! गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये ज्या दंगली उसळल्या, त्यात बहुतांश घटनांमध्ये मार देणारे हिंदु होते, तर मार खाणारे मुसलमान ! आपल्या धर्मबांधवांची मुसलमानांनी केलेल्या अमानुष कत्तलीनंतर हिंदू पेटून उठले. हिंदूंवर आघात होत असतांना नेहमी निद्रिस्त असलेल्या हिंदूंचे हे आक्रमक रूप अख्ख्या जगाने पाहिले. ‘हिंदूंमध्ये जागृत झालेल्या या आक्रमक वृत्तीचे अनुकरण भारतातील समस्त हिंदूनी केले, तर आपली डाळ शिजणार नाही’, हे निधर्मीवाद्यांनी जाणले. त्यामुळे मिळेल त्या माध्यमांतून हिंदुत्ववाद्यांवर टीका करून हिंदूंमध्ये जागृत झालेल्या हिंदुत्वाचे खच्चीकरण करण्यास आरंभ केला. याचा परिणाम असा झाला की, हिंदूंमध्ये अपराधीपणाची भावना जोपासली जाऊ लागली.
    आता पुढील काही दिवस गोध्रा हत्याकांडाचे निधर्मीवाद्यांच्या ‘हिरव्या’ दृष्टीकोनातून अवलोकन होऊन हिंदूंचा तेजोभंग होतच राहील. या पार्श्वभूमीवर हिंदुहितासाठी आणि हिंदूंना त्यांनी न केलेल्या चुकीचा अपराधीपणा वाटू नये, म्हणून या घटनेचे हिंदुहिताच्या दृष्टीकोनातून अवलोकन होणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदुत्ववाद्यांना एवढ्या अमानुषपणे ठार मारण्याचे षड्यंत्र रचण्याचे धारिष्ट्य मुसलमानांनी का केले ? हिंदू निद्रिस्त होते म्हणूनच ! या घटनेनंतर हिंदूंनी जी आक्रमक भूमिका घेतली, त्यानंतर गुजरातमध्ये पुन्हा धार्मिक दंगली घडल्या नाहीत. गोध्रा हत्याकांडातून ‘हिंदुसंघटनामुळे कसा लाभ होतो’, हेच हिंदूंनी शिकणे आवश्यक आहे. परिणामकारक हिंदुसंघटनामुळे मुसलमानांवर एवढी वचक बसायला हवी की, यापुढे गोध्रा हत्याकांडासारखा प्रकार घडवून आणण्याचा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवणार नाही. गोध्रा हत्याकांडामध्ये रक्त सांडलेल्या हिंदुत्ववाद्यांना हीच खरी श्रद्धांजली असेल ! 

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi