चेन्नई - शासकीय कार्यालयात आयुधपूजा किंवा सरस्वती पूजा केल्याने निधर्मीवादाला ठेच पोहोचत नाही, असा निवाडा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. शासकीय कार्यालयात होणारे धार्मिक कार्यक्रम रहित करण्यात यावे, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. हे वृत्त ‘इंडियाटाईम्स’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.