मुंबई, ५ फेब्रुवारी - राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अधिकाधिक पारदर्शक व्हाव्यात, याकरता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सूचना मागितल्या होत्या. मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत केवळ सात जणांनी सूचना पाठवल्याने मंडळाची घोर निराशा झाली आहे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ञ, अधिकारी, तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संघटना या सर्वांना हे आवाहन करण्यात आले होते. मंडळाच्या परीक्षांमध्ये होणारे अपप्रकार कसे थांबवावेत, या विषयी विशेषतः या सूचना मागवण्यात आल्या होत्या. दुर्दैवाने कोणालाही या विषयी स्वारस्य वाटले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (यातून आदर्श विद्यार्थी घडवण्याविषयी शिक्षणक्षेत्रातील सर्वच व्यक्ती, स्वत: विद्यार्थी आणि पालक किती उदासीन आहेत, हे स्पष्ट होते. शिक्षणतज्ञांची ही उदासीनता देशासाठी घातकच म्हणावी लागेल ! - संपादक)
विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ञ, अधिकारी, तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संघटना या सर्वांना हे आवाहन करण्यात आले होते. मंडळाच्या परीक्षांमध्ये होणारे अपप्रकार कसे थांबवावेत, या विषयी विशेषतः या सूचना मागवण्यात आल्या होत्या. दुर्दैवाने कोणालाही या विषयी स्वारस्य वाटले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (यातून आदर्श विद्यार्थी घडवण्याविषयी शिक्षणक्षेत्रातील सर्वच व्यक्ती, स्वत: विद्यार्थी आणि पालक किती उदासीन आहेत, हे स्पष्ट होते. शिक्षणतज्ञांची ही उदासीनता देशासाठी घातकच म्हणावी लागेल ! - संपादक)