एक सनदी अधिकारी सौ. लीना जैन यांनी देशातील विदारक स्थितीविषयी मांडलेली सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. लोकशाहीतील प्रत्येक क्षेत्रच कसे अकार्यक्षम, भ्रष्ट आणि जनताद्रोही आहे, हेच त्यांच्या पुढे दिलेल्या सूत्रांतून स्पष्ट होते.
मुक्त अर्थव्यवस्थेचे फलित गँगस्टर भांडवलशाहीची निर्मिती !आज देशातील मुक्त अर्थव्यवस्थेत बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रवेश झाला आहे. हा प्रवेश सर्व विदेशी लाभासाठी आणि केंद्रीय मंत्री अन् त्यांचे कुटुंबीय यांना खाण्याचे कुरण मिळावे, यासाठी देण्यात आला आहे. यातून जनतेचे कल्याण होत नाही. मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली माफिया लोक वर्षाला पंधराशे अब्ज अमेरिकी डॉलर्स कमवत आहेत आणि याला भारत शासनही उत्तरदायी आहे. - सौ. लीना जैन, एक सनदी अधिकारी
