सौ. लीना जैन यांनी देशातील
विदारक स्थितीविषयी मांडलेली सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
लोकशाहीतील प्रत्येक क्षेत्रच कसे अकार्यक्षम, भ्रष्ट आणि जनताद्रोही आहे,
हेच त्यांच्या या सूत्रांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.
अर्थव्यवस्थेचे खच्चीकरण होण्यास विद्यमान लोकशाही उत्तरदायी !
देशाला
स्वतःची अर्थव्यवस्था देऊन त्याचा विकास करण्याचे दायित्व शासनाचे आहे;
परंतु भारतात घटनेची पायमल्ली करून सार्वजनिक क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न
भांडवलशाही लोकांना अत्यल्प किमतीत दिले जाते. यामुळे भांडवलशाही लोक
अर्थव्यवस्थेला दरिद्री करून राजकीय नेत्यांशी युती करून जनतेला मनस्ताप
देत आहेत. न्यायव्यवस्था नागरिक या नात्याने या युतीला आक्षेप न घेता
त्यांच्या अनियमित अनुचित व्यवहाराला प्रोत्साहन देत आहेत. प्रसारमाध्यमे
भांडवलशहा अन् राजकीय नेते यांची काळीकुट्ट पार्श्वभूमी जनतेसमोर प्रकाशात
आणत नाहीत. आज ते सर्व सार्वजनिक निधीच्या लूटमारीचे साक्षीदार बनले आहेत
आणि याला भारतातील विद्यमान लोकशाही उत्तरदायी आहे. - सौ. लीना जैन
