'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

जोतिबाची मानाची घोडी लिलावात काढणार !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा हिंदुद्रोही निर्णय !

हिंदुत्ववादी संघटना याविषयी तोंड उघडून साधा निषेध तरी नोंदवणार का ?


कोल्हापूर, ३० जून - महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील कोट्यवधी हिंदूंचे कुलदैवत असलेल्या श्री जोतिबादेवाच्या मानाच्या असणार्‍या मुख्य घोडीचा लिलाव करण्याचा घाट पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घातला आहे. 

तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मूर्तीवरील अभिषेक बंद होणार !

श्री भवानीदेवीची मूळ मूर्ती

उच्च न्यायालयाला पुरातत्व विभागाच्या अहवालाच्या कार्यवाहीची अपेक्षा
  • पुजारी आणि भाविक यांच्यात संताप
  • अभिषेकावरील बंदी धर्मशास्त्राच्या विरोधात

संभाजीनगर, ३० जून - तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मूर्तीवरील अभिषेकामुळे होणार्‍या झीजेच्या संदर्भात केंद्रीय पुरातत्व विभागाने दिलेल्या अहवालाची कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा मुंबई उच्च

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक



गुरु शिष्याला माध्यम न करता स्वयंप्रकाशी करतात.

के.एफ.डी. आणि पी.एफ.आय. या देशद्रोही संघटनांवर बंदी घालण्याची श्रीराम सेनेची मागणी

बेंगळुरू, ३० जून (वार्ता.) - देशद्रोही आणि समाजविघातक अशा ‘कर्नाटक फोरम फॉर डेमोक्रेसी’ (के.एफ.डी) आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ.आय.) या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी श्रीराम सेनेने कर्नाटकचे

किम डेवीला भारतात आणण्यास केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अपयशी

पुरुलिया शस्त्रकांड

राष्ट्रप्रेमींना छळणारी आणि राष्ट्रद्रोह्यांना मोकळीक देणारी निधर्मी काँग्रेसच्या राज्यातील अन्वेषण यंत्रणा !

नवी दिल्ली, ३० जून - बंगालमधील पुरुलिया येथे दोन दशकांपूर्वी विमानातून शस्त्रे टाकण्यात आली होती. या शस्त्रकांडातील प्रमुख आरोपी किम डेवी याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून प्रयत्न चालले होते.

सातारा जिल्हा पोलीसप्रमुखांकडून पालखी तळावर रात्री १० नंतर ध्वनीवर्धक लावण्यास बंदी

दैनिक ‘पुढारी’च्या वृत्ताने वारकर्‍यांत संताप

सोहळ्यावर येणारे असे निर्बंध म्हणजे दोन्ही काँग्रेसकडून हिंदूंना नाडण्याचे षड्यंत्रच !

लोणंद (जिल्हा सातारा), ३० जून - संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी १ जुलै या दिवशी सातारा जिल्ह्यात येत आहे. नीरा नदीच्या काठावरील पाडेगाव फार्म येथे पालखीची व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण व्यवस्थेची पहाणी

‘हिंदु संस्थांचा तिरस्कार आणि मुसलमान अन् खिश्चन संस्थावर मेहेरनजर, हा तमाशा कुठवर चालणार ?’ - विश्व संवाद केंद्र, मेरठ (राष्ट्रपर्व, बेळगाव, ११.१.२०१०)




अमरनाथ यात्रेस प्रारंभ


जम्मू - हिंदूंच्या पवित्र अमरनाथ यात्रेस मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. बर्फाचे शिवलिंग पूर्णपणे तयार झाले असून लाखो भाविक या शिवलिंगाचे दर्शन घेणार आहेत.

हुबळी-धारवाड (कर्नाटक) महापालिकेत हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यास भाजपच्या नगरसेवकांचा विरोध

हुबळी (कर्नाटक), ३० जून (वृत्तसंस्था) - हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या मासिक सर्वसाधारण बैठकीत हिंदुद्वेष्टे चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यास भाजपच्या नगरसेवकाने आक्षेप घेतला. म.फि. 

विवाहबाह्य संबंधांमुळे विवाहसंस्कृतीला थेट अपाय ! - उच्च न्यायालय

मुंबई, ३० जून (वार्ता.) - विवाहसंस्कृती म्हणजे एक मर्यादाशील जीवनपद्धती आहे. यातून पती-पत्नी एकमेकांना समजून जीवन जगत असतात; परंतु सध्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी जी प्रकरणे येत

हुबळी (कर्नाटक) येथील हिंदूंनी खिस्त्यांचा धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला !

हुबळी (कर्नाटक) - येथील सदाशिवनगरातील एक हिंदु महिला एकटीच असल्याचे पाहून संदीप एम्. आणि आयझॅक या दोन खिस्ती धर्मप्रसारकांनी घरात प्रवेश केला. त्यांना येशूच्या प्रार्थनेचे महत्त्व सांगू लागले. ‘येशूला प्रार्थना केल्यास सर्व व्याधी, अडचणी आदी दूर होतात’ असे सांगून त्यांनी महिलेला धर्मांतर करण्याचा आग्रह केला. (हिंदूंनो, खिस्त्यांचा कुटील डाव ओळखा. येथून पुढे अशा धर्मप्रसारकांना घरात घ्यायचे नाही, असा निर्धार केला, तरच तुमचे हिंदुत्व अबाधित राहील, हे सत्य जाणा ! - संपादक) ही गोष्ट

पद्मनाभस्वामी मंदिरात ७०० कोटी रुपयांचा खजिना

थिरूवनंतपूरम (केरळ) - येथील सुप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या तळघरात ७०० कोटी रुपयांचा मौल्यवान खजिना सापडला आहे. येथे मौल्यवान खजिना असल्याच्या कथा सांगितल्या जात होत्या. आता हे सिद्ध झाले

‘हुतात्म्यांना वंदन करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.’ - अधिवक्ता विनायक देशपांडे, सांगली




बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

मुंबई, ३० जून (वार्ता.) - गुजरात दंगलीनंतर रंधीकपूर गावात बिल्कीस बानो यांच्या घरावर जमावाने आक्रमण करून घरातील आठ जणांची हत्या केली. तसेच बिल्कीस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप या

शिरढोण येथे धर्मशक्ती सेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांचा स्मृतीदिन साजरा

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. मिलींद पोशे

पनवेल, ३० जून - धर्मशक्ती सेनेच्या वतीने शिरढोण येथे राजमाता जिजाऊ यांचा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महिला मंडळाच्या सदस्या सौ. रोहिणी वाझे यांनी जिजाऊंच्या प्रतिमेला

शासनाला जाग आणण्यासाठी भगतसिंगांच्या मार्गाने जाण्याची आवश्यकता - अतुल शहा


सांगली ‘व्यापार बंद’ला व्यापार्‍यांचा प्रतिसाद

सांगली, ३० जून (वार्ता.) - सध्याचे राज्यकर्ते गेंड्याच्या कातडीचे असल्याने त्यांना आता  त्यांच्याच भाषेत जाब विचारण्याची वेळ आली आहे. व्यापार्‍यांनी आजपर्यंत सनदशीर मार्गाने लढा दिला; मात्र शासनाने त्याकडे

उच्च न्यायालयात महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न


मुंबई, ३० जून (वार्ता.) - मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारच्या सुमारास एक मध्यमवयीन विवाहित महिला न्यायमूर्ती (श्रीमती) रंजना देसाई यांच्या न्यायालयाच्या बाहेर बसली होती. काही वेळाने त्या महिलेने तिच्या

स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन, चोपडाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य वह्यावाटपासाठी नावनोंदणी


चोपडा, जिल्हा जळगाव, ३० जून (वार्ता.) - चोपडा येथील स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन आजपर्यंत अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत आले आहे. यंदा १०० गरीब आणि होतकरू शालेय

भारतातही हीच शिक्षा पद्धती राबवल्यास गुन्ह्यांचे प्रमाण लवकर घटेल !


‘सिंगापूर या देशात आर्थिक गैरव्यवहार, हत्या, अमली पदार्थांचा व्यापार, घातक शस्त्र बाळगणे इत्यादी गुन्ह्यांसाठी थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाते.’

मुंबईतील मुख्य जलवाहिनीकडील झोपड्या पाडण्याचे काम चालूच रहाणार ! - महापालिकेची उच्च न्यायालयात भूमिका

मुंबई, ३० जून (वार्ता.) - मुंबईच्या मुख्य जलवाहिनीभोवती वसलेल्या सहस्त्रावधी झोपड्या हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमात पहिल्या स्तरावर २ सहस्त्र २०० झोपड्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात

आता माझ्या अपकीर्तीचे काय ? - पोलीस अधिकारी अनिल महाबोले


जे. डे यांच्या हत्येचे प्रकरण

मुंबई, ३० जून - ‘मिड-डे’चे पत्रकार ज्योतिर्मय डे ऊर्फ जे.डे यांच्या विरोधात न्यायालयात अपकीर्तीचा खटला दाखल करणारे साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल महाबोले यांची जे. डे यांच्या हत्येनंतर मुंबई पोलिसांनी कसून

आरोपींना निर्दोश सोडण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य - उच्च न्यायालय

परदेशी मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरण

मुंबई, ३० जून (वार्ता.) - ‘टाटा इन्स्टीट्युट’मध्ये शिकणार्‍या अमेरिकेतील नागरिकत्व असलेल्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातून सर्वच्या सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्याचा सत्र

माओवाद्यांकडून दोघांची हत्या !


नक्षलवादग्रस्त भारत !

कुरखेडा (जिल्हा गडचिरोली), ३० जून - तालुक्यातील खोब्रामेंढा येथे आज दुपारी १२.३० वाजता निजामशहा काटेंगे (वय ३५ वर्षे) आणि रतन काटेंगे (वय २८ वर्षे) यांची माओवाद्यांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. या दोघांचेही

कोलकाता येथील रुग्णालयात ४८ घंट्यांत १७ बालके दगावली


नवी दिल्ली, ३० जून - कोलकाता येथील बी.सी. राय रुग्णालयात गेल्या ४८ घंट्यांत १७ नवजात बालके दगावली आहेत. गेला एक आठवडा ही बालके या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल झालेली होती. या बालकांवर 

फलक प्रसिद्धीकरता : हिंदूंनो, हिंदुद्रोही काँग्रेसी राज्यकर्त्यांकडून तुमच्या श्रद्धास्थानांवर होत असलेले आघात जाणा !


महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील कोट्यवधी हिंदूंचे कुलदैवत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबादेवाच्या मानाच्या असणार्‍या मुख्य घोडीचा लिलाव करण्याचा घाट पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घातला आहे.

शिवसैनिक हीच आमची संपत्ती - शिवसेनाप्रमुख

मुंबई, ३० जून - लाखो शिवसैनिक हीच आमची खरी संपत्ती असून ही संपत्ती कोण जप्त करू शकेल का, असा प्रश्न शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना'च्या अग्रलेखामधून आज केला. 

हत्येप्रकरणी मॅथ्यू, तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी मारिया दोषी

नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरण

मुंबई, ३० जून - नीरज ग्रोव्हर यांच्या हत्येच्या प्रकरणी एमिल जेरोम मॅथ्यू याला आणि पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणी कन्नड अभिनेत्री मारिया सुसाइराज हिला आज मुंबई जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी उद्या होणार आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यात राजमाता जिजाबाई भोसले स्मृतीदिन साजरा !

जिजाऊंविषयी उपस्थितांना संबोधित करतांना समितीच्या सौ. मनीषा क्षीरसागर
ठाणे, २९ जून (वार्ता.) - राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी, मुरबाड या ठिकाणी जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. या वेळी शेकडो धर्माभिमानी उपस्थित होते.

डोंबिवली येथे सनातन संस्था रायगड न्यासाच्या वतीने योग शिबिराचे आयोजन

योग शिबिराचे प्रात्यक्षिक दाखवतांना सौ. अमृता संभूस  
डोंबिवली, ३० जून (वार्ता.) - सनातन संस्था रायगड न्यासाच्या वतीने नुकतेच येथील साधक श्री. कार्तिक साळुंखे यांच्या निवासस्थानी महिलांसाठी विनामूल्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा २५ पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला. या वेळी न्यासाच्या सौ. अमृता संभूस आणि सौ. प्रतिमा परब यांनी उपस्थित महिलांना योगासने, प्राणायाम यांची तात्त्विक माहिती दिली अन् प्रात्यक्षिकेही करून घेतली. या वेळी श्री. साळुंखे यांच्या इमारतीतील अन्य रहिवाशांनीही ‘न्यासाचा हा उपक्रम चांगला आहे’, अशी प्रतिक्रिया दिली.


साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना, तसेच या तिथींच्या दोन दिवस आधी अन् दोन दिवस नंतर वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात होत असल्याने प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

जिल्हासेवकांना सूचना : गुरुपौर्णिमेचे दृक्श्राव्य निमंत्रण विज्ञापन आपल्या जिल्ह्यात दाखवण्याचे नियोजन करा !

प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त साधक घरोघरी जाऊन प्रसार करतात. यंदा अशा प्रकारच्या प्रसाराच्या जोडीला जिल्ह्यांना गुरुपौर्णिमा निमंत्रणाचे १ मिनिटाचे दृव्âश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) विज्ञापन मराठी, हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे विज्ञापन सर्व जिल्ह्यांना संगणकीय पत्राद्वारे पाठवण्यात आले आहे. साधकांनी ते स्थानिक दूरचित्रवाहिनीवर (केबल नेटवर्क) दाखवण्याचे नियोजन करावे.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. हिमांशी सिंग (वय १४ वर्षे) !

 कु. हिमांशी सिंग ही मथुरेची रहाणारी आहे. ती ९ वीत गेली आहे. ती सुटीत गेले दोन महिने रामनाथी आश्रमात होती. एवढी लहान असूनही ती आश्रमात असतांना इंग्रजी-विभागात संगणकावर टंकलेखनाची सेवा करत होती. आज तिचा तिथीने वाढदिवस आहे. यानिमित्त तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. हिमांशी सिंग हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवारातर्फे  हार्दिक शुभेच्छा !

पहार्‍याच्या सेवेसंदर्भात झालेली विचारप्रक्रिया, प्रयत्न आणि आलेल्या अनुभूती

कु. दीपा तिवाडी
१. ‘आज लवकर झोपूया’, असे ठरवणे आणि रात्री पहार्‍याच्या सेवेत नाव वाचल्यावर ही सेवा कशी जमणार, असे वाटणे, नंतर ‘ती सेवा जमणार आहे; म्हणूनच ईश्वराने निवड केली आहे आणि तोच करवून घेणार आहे’, असे विचार मनात येणे : ‘७.६.२०११ या दिवशी दुपारपासूनच माझ्या मनात येत होते, ‘आज लवकर झोपूया. दोन दिवस आपण लवकर उठत आहोत.’ शारीरिक क्षमताही घटल्यासारखे वाटत होते. रात्री जेवण झाल्यावर १०.३० वाजता फलकावर पहार्‍याच्या नियोजनात माझे नाव वाचले. तेव्हा ‘मला झोप येत असून मी पहारा कशी करणार’, असे वाटून अस्वस्थता जाणवू लागली.

गुरूंच्या स्थूलदेहाच्या आसक्तीसंदर्भात ६० टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍यांचे महत्त्व

सौ. सौम्या कुदरवळ्ळी
१. प.पू. डॉक्टरांची प्रकृती चांगली नसल्याचे साधिकेकडून समजल्यावर वाईट वाटणे आणि त्याविषयी श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करणे
    ‘सौ. श्रुती आचार्य रामनाथी आश्रमात असतांना त्यांना आलेल्या अनुभूती, तसेच जाणवलेली सूत्रे त्या एकदा कथन करत होत्या. ते ऐकतांना ‘मलाही रामनाथी आश्रमात जाऊन प.पू. डॉक्टरांना भेटावे’, असे वाटत होते. नंतर तार्इंनी सांगितले, ‘प.पू. डॉक्टरांची प्रकृती चांगली नाही. ते व्यवस्थित बसू किंवा बोलूही शकत नाहीत; पण साधकांप्रती असलेल्या प्रेमामुळे ते साधकांना भेटून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात.’ हे ऐकल्यावर मला अधिक वाईट वाटले. याविषयी श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करतांना आमचे पुढील संभाषण झाले.

समष्टी भाव असलेली आणि १०० टक्के पातळी गाठण्याचे ध्येय ठेवणारी कु. कनकमहालक्ष्मी !

कु. कनकमहालक्ष्मी 
 ‘ज्येष्ठ शु. अष्टमी, कलियुग वर्ष ५११३ (९.६.२०११) या दिवशी कु. कनकमहालक्ष्मी प.पू. डॉक्टरांना भेटली. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी तिच्या संदर्भात सांगितलेले सूत्र, तसेच तिच्याकडून मला साधनेसंदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

श्री. शशीकांत पवार यांना गंभीर आजारपणात आलेल्या अनुभूती

श्री. शशीकांत पवार
‘मी नोव्हेंबर २०१० पासून कर्करोगाने आजारी आहे. यासाठी माझ्या अनेक चाचण्या आणि दोन शस्त्रकर्मे झाली. दुसर्‍या शस्त्रकर्मानंतर वैशाख शुद्ध दशमी/एकादशी, कलियुग वर्ष  ५११३ (१३.५.२०११) या दिवशी मी आधुनिक वैद्य कुलकर्णीकाकांसमवेत पनवेल येथील आधुनिक वैद्य नितीन जोशी यांच्याकडे पुढील पडताळणीसाठी गेलो होतो. त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि माझ्या दुसर्‍या शस्त्रकर्माच्या वेळी रुग्णालयात असतांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

विद्यार्थ्यांवरील शिस्तीच्या बडग्याचा अतिरेक !


शाळा म्हटले की, शिस्त हा प्रकार आपसूक आलाच. शाळेतील शिस्तीचा सर्वाधिक प्रभाव विद्यार्थ्यांवर असतो, असे म्हणणे अयोग्य नाही. भावी पिढीवर आदर्श नागरिकत्वाचे अन् मनुष्यत्वाचे संस्कार करायचे असतील,
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi
 
Copyright © 2012 Dainik Sanatan Prabhat Contact Us : dainikonline@gmail.com