असुरक्षित नवी मुंबई !
नवी मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) – नेरूळ येथील बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आतील सवालाख रुपयांचा ऐवज भरदिवसा चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी नेरूळ सेक्टर ६ येथे रहाणारे घरमालक अमोद नानाजी खांडेकर यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी त्यांच्या घरावर पाळत ठेवून ही चोरी केली.