ठाणे, ३१ जुलै (वार्ता.) - भिवंडीतील कशेळी आणि केवणी-दिवे येथील पूर्व प्राथमिक शाळांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुप्रिया गायकवाड यांनी `विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व आणि गुरुशिष्य परंपरा' या विषयावर प्रवचन घेतले. या प्रवचनाचा लाभ २५८ विद्यार्थ्यांनी घेतला. या प्रसंगी शाळेतील शिक्षकांचे चांगले सहकार्य लाभले.
क्षणचित्र - विद्यार्थ्यांनी शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करणार, तसेच प्रतिदिन आई-वडिलांना नमस्कार करणार, असे सांगितले.