'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

प्रफुल्ल पटेल यांनी घेतली कॅनडाच्या आस्थापनाकडून अडीच कोटी रुपयांची लाच !

लोकहो, केंद्रातील मंत्रीमंडळ म्हणजे राष्ट्राला लुटणारी दरोडेखोरांची टोळी आहे, हे समजून घ्या !
    इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली), ३ फेब्रुवारी - काँग्रेसप्रणीत केंद्रशासनातील अवजड उद्योगमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अडीच कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप कॅनडातील एक प्रख्यात नियतकालिक ‘ग्लोब अँड द मेल’ने केला आहे. पटेल यांनी ही लाच मूळ भारतीय असलेले; पण आता कॅनडामध्ये रहात असलेले नजीर कारीगर यांच्याकडून घेतली आहे.

अण्णा हजारे यांना रुग्णालयातून घरी सोडले

    गुडगाव (हरियाणा), ३ फेब्रुवारी - लोकपालच्या सूत्रावरून राष्ट्रव्यापी आंदोलन छेडणार्‍या श्री. अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे गेले पाच दिवस येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेतांना त्रास होत होता, तसेच त्यांचा रक्तदाबही वाढलेला होता. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.

सैन्यदल प्रमुखांची तक्रार फेटाळून लावण्यामागे शासनाचा पूर्वग्रह !

चुकांवर चुका करणार्‍या केंद्रशासनावर सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा एकदा ताशेरे !
जे शासन सैन्यदल प्रमुखांशी असे वागते, त्याच्या लेखी जनतेचे काय मूल्य असेल याचा आपण विचारच करू शकत नाही !
    इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली), ३ फेब्रुवारी - सर्वोच्च न्यायालयाने सैन्यदल प्रमुख जनरल व्ही.के सिंग आणि शासन यांच्यात चालू असलेल्या सिंग यांच्या वयाच्या वादाच्या संदर्भात ताशेरे ओढले आहेत.

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. गोंदवलेकर महाराज
 यांची आज जयंती

धुळे येथे क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या

धर्मांधांकडे मतभेद मिटवण्यासाठी शाब्दिक सामर्थ्य नाही. ते केवळ आक्रमण आणि हत्या जाणतात. हिंदूंचे रक्षण आणि सामाजिक शांती यांसाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
धुळे, ३ फेब्रुवारी - पाण्याच्या टँकरवर मुसलमान टँकर चालकासोबत काम करणार्‍या आपल्या भावाबरोबरच्या
भांडणाचा जाब विचारायला गेलेल्या अंकुश किसन हजारे याला मुसलमान टँकरचालकाने बेदम मारहाण करून त्याची हत्या केली.

राहुल गांधी आणि त्यांची ‘मम्मी’ ‘२-जी’वर गप्प का ? - शिवसेनाप्रमुख

    मुंबई, ३ फेब्रुवारी - मायावती यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध उत्तरप्रदेशात नरडे गरम करणारा काँग्रेसचा युवराज स्वतःच्या सरकारच्या २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर काहीच बोलत नाही. त्याची ‘मम्मी’ही गप्प आहे. पंतप्रधानही या सूत्रावर तोंड उघडत नाहीत. या मौनातच ‘सत्य’ दडले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस शासनावर दैनिक ‘सामना’तील संपादकियातून केली आहे.

लोकायुक्ताच्या सूत्रावरील गुजरात शासनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली

    इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली), ३ फेब्रुवारी - गुजरातच्या राज्यपाल कमला प्रसाद बेनीवाल यांनी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर्.ए. मेहता यांची राज्याच्या लोकायुक्त पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती करतांना राज्यपालांनी राज्यशासनाशी सल्ला-मसलत करणे बंधनकारक आहे. असे असतांना राज्यपालांनी लोकायुक्तांची एकतर्फी नियुक्ती केली. त्याविरोधात गुजरात शासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

महाराष्ट्रात ५३ लक्ष बनावट शिधापत्रिका !

    मुंबई, ३ फेब्रुवारी  - यापूर्वी राज्यात ४२ लक्ष बनावट शिधापत्रिका असल्याचे सांगणार्‍या काँग्रेस शासनाने काल मुंबई उच्च न्यायालयात मात्र हा आकडा तब्बल ५३ लक्ष असल्याचे सांगितले आहे. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत यासाठी उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवर काय कारवाई झाली, याचा अहवाल चार आठवड्यांत देण्याचा आदेश राज्यशासनाला दिला.

आसाममध्ये रेल्वे अपघातात ३ ठार, ५० घायाळ !

अपघातात जागतिक विक्रम करायला निघालेली भारतीय रेल्वे !
    गौहत्ती, ३ फेब्रुवारी - गौहत्ती येथे शुक्रवारी एका मानवरहित रेल्वे फाटकावर एक प्रवासी रेल्वेगाडी आणि जेसीबी यांच्यात टक्कर झाली. या भीषण अपघातात ३ व्यक्ती ठार, तर ५० व्यक्ती गंभीर घायाळ झाल्या आहेत.
    ही प्रवासी गाडी न्यू बोंगाईगाव स्थानकावरून गौहत्तीकडे निघाली होती. गौहत्तीपासून १५ किमी अंतरावर असलल्या मिर्जा भागात एका जेसीबीशी तिची टक्कर झाली. हा अपघात सकाळी ९.४५ वाजता झाला. अपघातानंतर गाडीचे पाच डबे रुळावरून घसरले.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

  शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी अदखलपात्र ठरवणारे दंडविधान आणि पोलीस हिंदु राष्ट्रात नसतील !
    सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ७९४ वा दिवस !
२.२.२०१२ : रात्री ८.२० वाजता सनातनच्या आश्रमासमोरून युवक ‘सनातन चोर’, असे ओरडत गेले.
३.२.२०१२ : सकाळी ६.०० वाजता तीन गाड्यांवरून तीन युवक ‘सनातन सनातन’ असे ओरडत गेले.
हिंदु राष्ट्रात हे दखलपात्र अपराध असतील !

सत्तेवर असलेले आणि नसलेलेही बहुतेक सर्वच राजकारणी भ्रष्ट आहेत !


शिवाजी पार्कवरील निवडणूक प्रचारसभांना आता कायमचा पूर्णविराम !

    मुंबई, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी स्पष्टपणे नकार दिला. तसेच ‘या महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला या मैदानात प्रचारसभा घेण्यास अनुमती दिली जाणार नाही’, असेही ठणकावून सांगितले.

शिवाजी पार्क न मिळाल्यास रस्त्यावर सभा घेऊ - राज ठाकरे

मुंबई, ३ फेब्रुवारी - शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळते; पण आम्हाला मिळत नाही. शिवाजी पार्कला अनुमती मिळाली नाही, तर रस्त्यावर सभा घेऊ, अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्तीगत टीका टाळावी ! - शरद पवार

अजित पवार, रा.रा. पाटील अन् नारायण राणे यांच्यातील वादाचे प्रकरण
    मुंबई, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - लोकशाहीत टीका करणे अयोग्य नाही; पण वैयक्तिक टीका चुकीची असून, ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टाळावी. अन्य पक्षाचे नेते कसेही वागू देत; पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयम सोडू नये, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आणि रा.रा. पाटील यांना फटकारले.

‘सेवनहिल्स’ पंचतारांकीत रुग्णालय महापालिकेला स्वतंत्र रुग्णालय बांधून देणार !

    मुंबई, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - मरोळ येथील ‘सेवनहिल्स’ रुग्णालयांतील २० प्रतिशत खाटा महापालिकेच्या तत्त्वानुसार सर्वसामान्य रुग्णांकरता विनामूल्य उपलब्ध कराव्यात, असा अट्टाहास आता मुंबई महापालिका प्रशासनाने सोडून द्यावा. त्याऐवजी सेवनहिल्स रुग्णालयाचे व्यवस्थापन महापालिकेला ३०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय बांधून देईल, असा प्रस्ताव रुग्णालयाच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आला.

पत्रकार संरक्षण कायदा करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात पत्रकारांची निदर्शने !

    मुंबई, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - वृत्तपत्र कार्यालये आणि पत्रकार यांच्यावर राजकीय पक्ष, गुंड, समाजकंटक यांच्याकडून वारंवार होणारी आक्रमणे अन् राज्यशासनाकडून पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्यात होणारी टाळाटाळ यांच्या निषेधार्थ ‘पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती’च्या नेतृत्वाखाली आज राज्यातील १८ संघटनांनी आझाद मैदानात निदर्शने केली. या प्रसंगी १ मे या महाराष्ट्र दिनी दिल्लीला निर्णायक आंदोलन करण्याची चेतावणीही देण्यात आली.

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या तेलशुद्धीकरण केंद्रानजीक निवासी इमारत असणे धोकादायक ! - उच्च न्यायालय

    मुंबई, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदुस्थान पेट्रोलियमच्या कुलाबा येथील तेलशुद्धीकरण केंद्रानजीक निवासी इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे तेलशुद्धीकरण केंद्राला निश्चित धोका उद्भवू शकतो, तसेच भोपाळ वायुगळतीसारखा अपघात झाल्यास त्या निवासी इमारतीमधील रहिवाशांच्याही जिवाला धोका होऊ शकतो, असे मत आज न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी मांडले.

गणेशमूर्तीच्या उंचीची मर्यादा ठरवण्यासाठी आज बैठक

    मुंबई, ३ फेब्रुवारी - सार्वजनिक गणेशमूर्तीची उंची न्यून करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय पातळीवरील प्रयत्न अपयशी ठरलेले असतांनाच आता खुद्द मर्तीकारच पुढे सरसावले आहेत. १८ फुटांहून अधिक उंचीच्या मूर्ती न घडवण्याचा निर्णय घेण्यासाठी उद्या, शनिवारी मूर्तीकारांची बैठक होणार आहे. दिनानाथ वेलिंग यांनी १९९०मध्ये लालबागच्या राजाच्या मंडळाची २२ फुटी मूर्ती घडवली आणि त्यानंतर उंचीबाबत स्पर्धा चालू झाली; मात्र गेल्या वर्षी त्यातून दुर्दैवी घटना घडली.

नव्या पिढीला ‘वन्दे मातरम्’ किंवा राष्ट्रगीत म्हणण्याचा कंटाळा, हे आपले दुर्दैव - कर्नल श्रीराम पेंढारकर

    डोंबिवली, ३ फेब्रुवारी - २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन दिवशीच आपल्याला देशाची आठवण होते. हे २ दिवस सोडले, तर अन्य दिवसांची ओळखही अनेकांना सांगता येणार नाही. १३ फेब्रुवारी या दिवशी काय घडले, हे कोणाला माहिती आहे का, यावर कोणालाच सांगता आले नाही. तेव्हा या दिवशी क्रांतीकारक राजगुरु यांना फाशी देण्यात आली. राजगुरुंसारख्या लोकांना आपण विसरलो आहोत.

बेस्टच्या वतीने ८० अतिरिक्त बसगाड्या धावणार

रविवारी चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मेगाब्लॉक
    मुंबई, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते अंधेरी या स्थानकांच्या दरम्यान येत्या रविवारी (५ फेबु्रवारी) सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या कालावधीत महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम होणार आहे. त्यामुळे या कालावधीत उपनगरीय गाड्यांच्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी एकही गाडी धावणार नाही, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी घोषित केले आहे.

८५ व्या साहित्य संमेलनाला चंद्रपूर येथे प्रारंभ

    चंद्रपूर, ३ फेब्रुवारी - ग्रंथ डोक्यावर घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी आणि वाद्यांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांच्या सुरांनी आज सकाळी निघालेल्या ग्रंथदिंडीने ८५ व्या साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. आझाद बाग चौकातून संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत डहाके यांच्या हस्ते या दिंडीचा प्रारंभ झाला.

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत महाशिवरात्री विशेषांक

जिल्हा समन्वयकांना सूचना
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा माघ कृष्ण ९/१० ते फाल्गुन शुक्ल १ (१६ फेब्रुवारी २०१२ ते २२ फेब्रुवारी २०१२) या कालावधित रंगीत ‘महाशिवरात्री विशेषांक’ प्रसिद्ध होणार आहे.
     या रंगीत अंकाची छपाई माघ कृष्ण १ (८ फेब्रुवारी २०१२) या दिवशी करण्यात येणार आहे. तरी सर्व जिल्हासमन्वयकांनी आपली मागणी मंगळवार, माघ पौर्णिमा (७ फेब्रुवारी २०१२) या दिवशी दुपारी ४ वाजेपर्र्यंत ईआर्पी या संगणकीय प्रणालीत भरावी.  त्याचप्रमाणे टपालाने (पोस्ट) सुरू करावयाच्या वर्गणीदारांची यादी माघ पौर्णिमा  (७ फेब्रुवारी २०१२) या दिवशी दुपारी ४ वाजेपर्र्यंत ईआर्पी या संगणकीय प्रणालीत भरावी. संपर्क क्र. : ९४०४९ ५६८८७
आपली प्रत आजच नोंदवा !   


‘हिंदु तेजा जाग रे’ !

खालील लघुसंदेश समाजात अनेकजण एकमेकांना पाठवत आहेत. वाचकांनो, तुम्हीही हे लघुसंदेश तुमच्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना पाठवून भ्रष्ट राजकारण्यांच्या विरोधात जनजागृती चळवळीला हातभार लावू शकता !
आजचा हिंदुजागृती लघुसंदेश !
JAGO !
Mulayam Singh mhantat - Balatkarit Mahile'la Govt.
Nokari denar.
- Mhanje te Balatkar rokhnar nahit, Balatkar karnaryala
shiksha denar nahit. ha ahe ka tynacha samajwad ?
जागो !
मुलायम सिंग म्हणतात - बलात्कारित महिलेला शासकीय नोकरी देणार. - म्हणजे ते बलात्कार रोखणार नाहीत, बलात्कार करणार्‍याला शिक्षा देणार नाहीत. हा आहे का त्यांचा समाजवाद ? 

फलक प्रसिद्धीकरता

टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
लोकहो, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनावर ओढलेले ताशेरे जाणा !
    सैन्यदल प्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी त्यांच्या वयाच्या संदर्भातील वादाविषयीची तक्रार केंद्रशासनाकडे केली होती. ‘त्यांची वैध तक्रार फेटाळून लावतांना शासनाने पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनातून निर्णय घेतला’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

वडिलांचा मृत्यू झाल्यावरही गुरुकार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने कृती करणार्‍या आधुनिक वैद्या (डॉ.) कु. माया पाटील !

    ‘माघ शु. नवमी, कलियुग वर्ष ५११३ (१.२.१०१२) या दिवशी सकाळी मी एका सूत्राच्या संदर्भात आधुनिक वैद्या (डॉ.) कु. माया पाटील यांना दूरभाष केला होता. तेव्हा ताई म्हणाल्या, ‘‘आज दादांचे लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. आम्ही जास्तीची दैनिके मागवल्यामुळे आमच्या नातेवाइकांनीही ते वाचले.

जसे गुन्हेगारांना पकडल्याचे कर्तव्य केल्यावर बक्षिसे देता, तसे अट्टल गुन्हेगार कारागृहातून पळून जाण्यास उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांना कडक शिक्षा का करत नाही ?

    ‘खिस्ताब्द २०१० मध्ये पळून गेलेला अट्टल गुन्हेगार मायकल फर्नांडिस याला २८.१.२०१२ या दिवशी पोलिसांनी पकडले. त्याच्या टोळीतील अनिल यादव आणि विजय स्वामी त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी पकडले आहे. मायकल याच्यावर आतापर्यंत वाहन चोर्‍या, घरफोडी, लूट अशा तर्‍हेचे ३२ गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी दोन वेळा मायकल पोलिसांच्या कह्यातून पळून गेला होता. या गुन्हेगारांना पकडल्याबद्दल संबधित पोलीस अधिकार्‍यांना बक्षिसे देण्यात येतील, असे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी सांगितले.’
                          

निवडणुकीत उमेदवारी देतांना केवळ स्वतःच्या कुटुंबियांचाच विचार करणारे राज्यकर्ते जनतेचे हित साधतील काय साधणार ?

महान भारतीय लोकराज्य !
    ‘गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी एकूण १४ जागांवर दावा केला आहे. चर्चील आलेमाव कुटुंबाने ४ जागांवर, तर रवी नाईक, प्रतापसिंग राणे आणि बाबुश मोन्सेरात यांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन जागांवर दावा केला आहे. तसेच पक्षाचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनीही त्यांच्या निकटवर्तीयांसाठी दोन जागांवर दावा केला आहे, तर मुख्यमंत्री कामत यांनी उद्योजक समीर साळगावकर आणि विजय पै खोत यांना तिकीट देण्याची मागणी केली आहे. गोव्याला खिस्ताब्द १९८७ या वर्षी घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मागील १५ वर्षांत १४ वेळा शासनात पालट झाला आहे.’                  

रविवारी होणार्‍या ‘लाईव्ह स्ट्रीम’च्या कार्यक्रमाशी संबंधित सूत्रे

    ‘माघ शु. त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११३ (५.२.२०१२) या दिवशी ‘लाईव्ह स्ट्रीम’चा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यासंबंधीची सूत्रे पुढे देत आहे.
१. साधकांनो, साधना आणि कार्य यांची घडी बसवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा !
१ अ. साधकांची साधना आणि कार्य यांची घडी नीट बसल्यावरच नव्या आणि जुन्या उपक्रमांविषयी विचार करता येणार असणे : सध्या संस्थास्तरावर अंतर्गत शुद्धीकरण मोहीम चालू आहे.

राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकराज्य नको, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !

एक सनदी अधिकारी सौ. लीना जैन यांनी देशातील विदारक स्थितीविषयी मांडलेली सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. लोकशाहीतील प्रत्येक क्षेत्रच कसे अकार्यक्षम, भ्रष्ट आणि जनताद्रोही आहे, हेच त्यांच्या या सूत्रांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

पुढील १०० वर्षांत येणार्‍या काळाविषयी द्रष्टे संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी वर्ष १९१३ पूर्वी केलेले निरूपण

     ‘माघ शु. द्वादशी, कलियुग वर्ष ५११३ (४.२.२०१२) या दिवशी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची जयंती आहे. ते द्रष्टे संत होते. त्यांनी वर्ष १९१३ मध्ये देहत्याग केला. शेवटीच्या निरूपणात त्यांनी ‘पुढील १०० वर्षांत काळ कसा येईल’, याविषयी सांगितले आहे. श्री. त्र्यंबक बापट यांनी ‘लीलामृत’ या ग्रंथांत हे लिहून ठेवले. आपण सर्व जण त्यांच्या या शब्दांची प्रचीती घेत आहोत. प्रत्येक शब्दातून महाराजांची कळकळ दिसून येते.

ज्ञानयोगापेक्षा भक्तीयोग समजणे सोपे

    ‘ज्ञानयोगात ‘सात्त्विक, राजसिक आणि तामसिक’ हे शब्द एखाद्या व्यक्तीचे वर्णन करतांना वापरतात. हे शब्द माहित नसलेल्याला त्यांचा अर्थबोध होत नाही. भक्तीयोगात सात्त्विक अन् सात्त्विक-राजसिक व्यक्तींना ‘दैवी गुणसंपन्न’ आणि तामसिक अन् तामसिक-राजसिक व्यक्तींना ‘आसुरी गुणसंपन्न’ तर अशा शक्तींना ‘काळी शक्ती’ म्हणतात. त्यामुळे लगेचच अर्थबोध होतो.’ - डॉ. आठवले (माघ शु. ९, कलियुग वर्ष ५११३ (१.२.२०१२))                             

साधकांनो, सनातन संस्थेच्या विविध प्रकारच्या आर्थिक वसुलीविषयीचा दृष्टीकोन लक्षात घ्या !

साधकांनो, पू. राजेंद्रदादांसारख्या संतांना जिल्ह्यातील प्रलंबित वसुली आणि अन्य गोष्टी यांविषयी पाठपुरावा करावा लागतो, या गोष्टीची खंत वाटून आपापल्या जिल्ह्याची घडी बसवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करूया !
     साधकांनो, पू. राजेंद्रदादा सध्या रुग्णाईत असूनही ते ‘लाईव्ह स्ट्र्रीम’द्वारे ३ घंटे आपल्याला मार्गदर्शन करतात. खरेतर त्यांनी त्यांचा वेळ चांगल्या साधकांना मार्गदर्शन करून त्यांची संतपदापर्यंत प्रगती करून घेण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे; पण आपल्या चुका आणि दोष यांमुळे त्यांना जिल्ह्यांतील प्रलंबित वसुली अन् अन्य गोष्टी यांविषयी पाठपुरावा करावा लागत आहे.

सनातन-निर्मित चैतन्यदायी ग्रंथ प्रत्येक ग्रंथालयात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वर्धा येथील कु. शर्वरी पाध्ये !

ग्रंथालयांत सनातन-निर्मित सात्त्विक ग्रंथांच्या माध्यमातून परिणामकारक प्रसार होईल, या उद्देशाने विदर्भातील प्रसारसेविका कु. शर्वरी पाध्ये यांनी विदर्भातील ग्रंथालयांचा अभ्यास केला. येथील विविध जिल्ह्यांतील ग्रंथालयांना संपर्क करून त्यांनी मोठ्या प्रमाणात विविध विषयांवरील सनातननिर्मित ग्रंथ वितरीत करण्याचा प्रयत्न केला.

साधकांनो, ग्रंथ वितरण प्रसाराची एक सोपी; पण परिणामकारक पद्धत आहे, तिचा अवलंब करून व्यापक प्रसार करूया - पू. राजेंद्र शिंदे

श्री. (पू.) राजेंद्र शिंदे, देवद, पनवेल
    संस्थास्तरावर पुढील दोन महिन्यांत ग्रंथालयांना ग्रंथ वितरीत करण्याची चळवळ राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विषयी पू. राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
तीव्र तळमळीमुळे केवळ दीड वर्षात ५ लक्ष रुपयांच्या ग्रंथांचे वितरण करणार्‍या कु. शर्वरी पाध्ये : मार्च महिन्यात सर्व वाचनालये आणि ग्रंथालये यांना शासनाकडून ग्रंथ खरेदीसाठी अनुदान (ग्रँट) मिळते.

अराजकाच्या वाटेवरील लोकराज्य (लोकशाही ) !

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा मंगळवारी संपली. अर्जांची छाननी आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायच्या अगोदरच प्रचाराला आरंभ ही झाला आहे. ज्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले ते अधिकृत उमेदवार आणि ज्यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केले आहेत, अशांनी प्रचाराला आरंभ केला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi
 
Copyright © 2012 Dainik Sanatan Prabhat Contact Us : dainikonline@gmail.com