Blogger Widgets
'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - प.पू. डॉ. जयंत आठवले
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सट्टेबाज रणजीपटू गुड्डेवार याचे काँग्रेसशी संबंध !

आयपीएल् क्रिकेट स्पर्धा करमुक्त करण्यामागे असलेले काँग्रेसचे 
अर्थकारण रणजीपटू गुड्डेवार याच्या सट्टेबाजातून उघड होते !
    चंद्रपूर - आयपीएल्मधील स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणी देहली पोलिसांनी रविवार, १९ मे यादिवशी अटक केलेला रणजीपटू मनीष गुड्डेवार याचे काँग्रेसशी संबंध असल्याचे उघड झाले असून मनीष हा प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि राहुल गांधी यांच्या कोअर समितीचे सदस्य पंकज गुड्डेवार यांचा सख्खा लहान भाऊ आहे. (विविध घोटाळे करून देशाला लुटणार्‍या काँग्रेसींचे नातेवाईकही भ्रष्टाचार करू लागले आहेत. आयपीएल्मधील काळ्या कृत्यांमध्ये एकप्रकारे काँग्रेसींचेच हित दडल्याने ते या स्पर्धेवर बंदी आणत नाहीत, असा जनतेला असलेला संशय मनीष याच्या अटकेमुळे बळावला आहे. लोकहो, आयपीएल्च्या नावाने चालू असलेला जुगार बंद करण्यासाठी शासनाला भाग पाडा ! - संपादक)

अभिनेता दारा सिंह यांचा पुत्र विंदू याला अटक

      मुंबई - आयपीएल् स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात अभिनेते दारा सिंह यांचा पुत्र अभिनेता विंदू याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सट्टेबाजांशी असलेल्या संबंधांमुळे विंदू याला अटक करण्यात आली आहे. सट्टेबाज रमेश व्यास याच्यासोबत त्याचे संबंध असल्याचा संशय आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात प्रथमच बॉलीवूडमधील एखाद्या कलावंताला अटक करण्यात आली आहे.
    विंदू याने ६ एप्रिल या दिवशी खेळवण्यात आलेला चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामना स्टेडियमवरील अतीमहनीय व्यक्तीच्या कक्षात बसून पाहिला होता. या वेळी त्याच्यासोबत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी होती. यासंदर्भात महेंद्रसिंग धोनी याने स्पष्टीकरण दिले आहे. विंदू अभिनेता असल्यामुळेच या कक्षात त्याला आमंत्रण देण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्याच्याशी इतर कोणताही संबंध नाही, असे धोनी याने म्हटले आहे.

कुंभमेळ्यावर बहिष्कार टाकण्याची निर्मोही आखाड्याची चेतावणी !

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीचे राखीव असलेले भूखंड गायब !
 हिंदूंनो, हिंदुबहुल भारतात तुमच्या सर्वांत मोठ्या उत्सवासाठी 
जागाही उपलब्ध होत नाही, हे भारताचे पाकिस्तान झाल्याचे लक्षण !
बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना हिंदुद्वेषी काँग्रेसी 
राज्यकर्त्यांना खडसवणार कि मूग गिळून शांत बसणार ?
    मुंबई, २१ मे - नाशिक येथे दोन वर्षांनी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सिद्धतेला आतापासूनच प्रारंभ झाला आहे; मात्र प्रारंभीच धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नाशिक महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी वादात सापडण्याची शक्यता आहे. ख्रिस्ताब्द २००३ मध्ये कुंभमेळ्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या एकूण १३५ एकर भूखंडापैकी आता केवळ ४८ एकर भूखंड उरले असून उर्वरित ८७ एकर भूखंड विकासकामे आणि अन्य गोष्टींसाठी वापरण्यात आले आहेत. (हिंदूंच्या कुंभमेळ्यासाठी आरक्षित असलेला भूखंड अन्य गोष्टींसाठी वापरणारे निधर्मी राज्यकर्ते मुसलमानांच्या बाबतीत असे वागले असते का ? हिंदू सहिष्णू असल्यानेच त्यांची दखल घेतली जात नाही. हिंदूंनो, प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील कुंभमेळ्याच्या वेळीही समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव शासनाने कुंभमेळ्यात हिंदूंना आवश्यक सुविधा पुरवल्या नाहीत. त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. महाराष्ट्राचे काँग्रेस शासनही हिंदुद्वेषी असल्याने तेही तसेच वागल्यास नवल ते काय ? हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध व्हा ! - संपादक)

म्हणे, राष्ट्रध्वजात भगवा नाही, नारिंगी रंग !

हिंदूंनो, भगव्याचा द्वेष करणार्‍या राज्यकर्त्यांना सत्ताच्युत करा !
काँग्रेस शासनाच्या (कु)प्रसिद्धीच्या विज्ञापनांतून राष्ट्रध्वजाचा अवमान !
    नवी देहली, २१ मे - देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रशासनाचे कौतुक करणार्‍या सद्भाव-आयडिया ऑफ इंडिया या नावाच्या विज्ञापनांची मालिका प्रसिद्ध करत आहे. या विज्ञापनांतून भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आला आहे. एक मिनिट ३८ सेकंदांच्या दृकश्राव्य विज्ञापनात देशातील विविध भागांमध्ये असलेला सद्भाव दाखवण्यात आला आहे. त्यात एका शाळेची विद्यार्थिनी राष्ट्रध्वजाचा रंग सांगतांना, पांढरा, हिरवा आणि नारिंगी अशा तीन रंगांचा मिळून तिरंगा बनला आहे, असे सांगते. राष्ट्रध्वजात नारिंगी रंग नसून भगवा रंग आहे, ही बाब माहिती खात्याच्या लक्षात का आली नाही, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. (काँग्रेस शासनाला भगव्या रंगाचीअ‍ॅलर्जी असल्यानेच त्याने जाणीवपूर्वक मुलीकडून असे वदवून घेतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अवमानाच्या विरोधात शासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करून संबंधितांना कठोर शिक्षा केली पाहिजे ! - संपादक)

मायावती यांच्या शासनकाळात १ सहस्र ४०० कोटी रुपयांचा स्मारक घोटाळा !

घोटाळ्यांचा देश झालेल्या भारताला यातून सोडवण्यासाठी हिंदू राष्ट्राला पर्याय नाही !    
     लक्ष्मणपुरी (लखनौ),  २१ मे - बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या उत्तरप्रदेशातील शासनकाळात तब्बल १ सहस्र ४०० कोटी रुपयांचा स्मारक घोटाळा झाल्याचा अहवाल लोकायुक्त एन्.के. मेहरोत्रा यांनी राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सादर केला आहे.
१. बसप नेता नसीमुद्दीन सिद्दिकी, तत्कालीन मंत्री आणि अधिकारी यांनी संगनमताने शासकीय निधीत भ्रष्टाचार केला, असे या अहवालात म्हटले आहे. तसेच या घोटाळ्यात १९९ लोकांचा सहभाग आहे, असे अहवालात म्हटले आहे.
२. मायावती यांच्या शासनाने लक्ष्मणपुरी आणि नोएडा येथे ५ सहस्र ९१९ कोटी रुपये खर्चून दलित महापुरुषांची १४ स्मारके उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला होता; पण प्रत्यक्षात त्यावर ४ सहस्र १८८ कोटी रुपये खर्च करून ३५ टक्के रक्कम मंत्री, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटदार यांनी खिशात घातली.

लोकांची वृत्ती पालटण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता ! - अभय वर्तक

झी-२४ तास वृत्तवाहिनीवरील रोखठोक कार्यक्रमात अश्‍लीलता 
पुतळ्यात कि नजरेत या विषयावरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग
लोकहो, अश्‍लीलतेचे समर्थन करणार्‍या झी-२४ तासवर बहिष्कार घाला !
दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात डावीकडून सूत्रसंचालक उदय निरगुडकर,
 श्री. अभय वर्तक, नगरसेविका सौ. रितू तावडे आणि जाहिराततज्ञ भरत दाभोळकर
     मुंबई - जसे माणसाचे विचार असतात, तशी त्याची वृत्ती असते आणि जशी वृत्ती असते, तशी तो कृती करतो. अंतर्वस्त्र घातलेल्या पुतळ्यांचे प्रदर्शन ही मनात विकृती निर्माण करणारी गोष्ट आहे. पहिल्या टप्प्याला ते हटवले गेले पाहिजेत, पुढच्या टप्प्यात विकृत विचारांना चालना देणार्‍या प्रत्येक गोष्टींवर बंधने आणावी लागतील. द्रष्टा दृश्यवश्याद्बद्धो दृश्यभावे विमुच्यते । असे संस्कृत वचन आहे; म्हणजे द्रष्टा (जीव) हा दृश्यामुळे बद्ध होत असतो आणि ज्या वेळी दृश्याचा अभाव होईल, त्या वेळी तो मुक्त होतो. अश्‍लीलता मनात असली किंवा नसली तरी अशा गोष्टींमुळे मनात विचार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दुकानांच्या बाहेरील अंतर्वस्त्र घातलेल्या पुतळ्यांच्या प्रदर्शनावर बंदी आणलीच पाहिजे.

विवाहापूर्वी सहमतीने होणारा शारीरिक संबंध हा बलात्कार नव्हे ! - सर्वोच्च न्यायालय

सहमतीने असले, तरी विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे, हे अनैतिकच होय. 
हिंदु संस्कृतीमध्ये त्याला पाप म्हटले असून त्याचे परिणाम भोगावे लागतात !
    नवी देहली, २१ मे - एखाद्या पुरुषाने एखाद्या सज्ञान महिलेशी विवाहाचे वचन देऊन दोघांच्या सहमतीने शरीरसंबंध झाला आणि परिस्थितीमुळे विवाहाचे आश्‍वासन तो पुरुष पाळू शकला नाही, तर त्याने या महिलेशी ठेवलेला शरीरसंबंध हा बलात्कार म्हणता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २० मे या दिवशी दिला.  बलात्कारासाठी एका पुरुषाला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्याचा पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेश रहित करतांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. बी.एस्. चौहान आणि न्या. दीपक मिश्रा यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला. (उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय पालटते, हा चक्रावणारा न्याय ! - संपादक) बलात्कार आणि संमतीने शरीरसंबंध यामध्ये भेद असून आरोपीचा हेतू वाईट होता, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला, तरच आरोपीला बलात्काराच्या संदर्भात दोषी ठरवता येईल, असे न्यायालयाने  म्हटले आहे.

मेदिनीपूर (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांकडून कालीमाता आणि हनुमान यांच्या मूर्तींची तोडफोड

तृणमूल काँग्रेस (टोटल मुस्लीम काँग्रेस)च्या राजवटीत उद्दाम झालेले धर्मांध मुसलमान !
धर्मांध मुसलमानांनी तोडफोड केलेल्या हनुमान आणि कालीमाता यांच्या मूर्ती
 (हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना
 दुखावण्याचा उद्देश नसून मुसलमानांचा हिंदुद्वेष ज्ञात व्हावा हा आहे.)
     मेदिनीपूर (बंगाल) - २०० धर्मांध मुसलमानांनी एका अपघाताच्या प्रकरणानंतर हिंदूंवर आक्रमण करून  मंदिरातील कालीमातेची आणि हनुमानाची मूर्ती यांची तोडफोड केली. रविवार, १९ मेच्या रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर शहरात कुठलाच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी त्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. (मुसलमानांना हिंदूंच्या मूर्ती तोडू द्यायच्या आणि त्याच्या निषेधार्थ हिंदू एकत्र येऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करायचा, हा पोलिसांचा हिंदुद्रोहच आहे ! अशा पोलिसांना हिंदु राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा करण्यात येईल !- संपादक) धर्मांधाकडून झालेल्या मूर्तीभंजनाच्या निषेधार्थ बजरंग दल आणि इतर काही संघटना यांच्या सदस्यांनी रस्ताबंद आंदोलन केले, तसेच २० मे या दिवशी बंद पाळला.

खाजगी बसगाड्यांकडून प्रवाशांची लूट !

दर निश्चित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन कधी होणार ?
मुंबई, २१ मे (वार्ता.) - सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्या पडल्या असून सर्वत्र पर्यटन व्यवसायाला जोर आला आहे. विशेषतः कोकण भागात जाणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून तेवढ्या संख्येने प्रवाशांची वाहतूक करण्यास आता रेल्वे सेवाही अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रवासी खाजगी बसगाड्यांकडे वळत आहेत. याचाच फायदा घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही खासगी बसगाड्यांच्या आस्थापनांनी प्रवाशांची अक्षरशः लूट चालू केली आहे. हा प्रकार थांबावा याकरता मुंबई उच्च न्यायालयाने या आधीच  खाजगी बसगाड्यांचे दर निश्चित करण्याचा आदेश राज्यशासनाला दिला होता; मात्र शासनाने अद्याप त्यावर कार्यवाही केलेली नाही. शासनाच्या या निष्काळजीपणामुळे लक्षावधी प्रवाशांचा मात्र नाहक छळ होत आहे. (लोकहो, तुमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे आणि न्यायालयाच्या आदेशालाही न जुमानणारे उद्दाम शासन हटवा ! - संपादक) 

प्रभाकर देशमुख यांचे मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन चालूच !

आंदोलनाची कोणतीही दखल न घेता उलट जनतेची कुचेष्टा करणारया 
माणुसकीहीन राज्यकर्त्यांचे निरर्थक लोकराज्य आता पुरे !
पाण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलनास बसल्याचा आज १०७ वा दिवस !
मुंबई - उजनी धरणातून सोलापूरला पाणी देण्याच्या मागणीसाठी मोहोळ येथील प्रभाकर देशमुख गेले १०६ दिवस आझाद मैदानात धरणे आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाकडे इतके दिवस राज्यकर्त्यांनी अजिबात लक्ष दिले नाही, उलट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुचेष्टा केली.

कोळसा घोटाळ्याचे अन्वेषण करणार्या मुख्य अधिकार्योला लाच घेतांना अटक

नवी देहली, २१ मे - कोळसा खाण वाटप घोटाळ्याचे अन्वेषण करणारे केंद्रीय अन्वेषण विभागाचे मुख्य अन्वेषण अधिकारी विवेक दत्ता यांना भूमीचा वाद मिटवण्यासाठी १५ लाख रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर एका निरीक्षकालाही अटक करण्यात आली आहे. देहलीतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या दक्षता पथकाने ही अटक केली आहे. दत्ता हे अधीक्षक स्तराचे अधिकारी आहेत. 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील तलावाची स्वच्छता

स्थानिक स्वराज्य संस्था निष्क्रीय असल्यामुळेच आध्यात्मिक संघटनांना 
अशा प्रकारची कामे करावी लागतात ! ही स्थिती पालटण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !
     पनवेल - थोर आध्यात्मिक विभूती नानासाहेब धर्माधिकारी यांचे चिरंजीव श्री. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वडाळे तलावाची स्वच्छता करण्यात येत आहे. नानासाहेबांचा अध्यात्माचा वारसा सक्षमपणे चालवतांना समाजातील घाणही स्वच्छ करता यावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील बल्लाळेश्व,र मंदिराजवळ २० मे या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून या अभियानाला प्रारंभ झाला आहे.

भूगोलच्या अभ्यास मंडळाला कारणे दाखवा नोटीस !

राष्ट्राच्या अस्मितेशी खेळणार्यांयवर संथ गतीने कारवाई करणारे 
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ! 
पुणे - १० वीच्या भूगोलच्या पुस्तकात नकाशे चुकल्याविषयी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने भूगोल विषयाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याविषयी मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव म्हणाले, या प्रकरणात मंडळाचे जे सदस्य दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीने सध्या कार्यवाही चालू आहे. (या प्रकरणात मंडळाकडून केवळ कागदी घोडे नाचवणे अपेक्षित नाही. जे सदस्य चुकले असतील त्यांच्यावर आतापर्यंत कठोर कारवाई होणे अपेक्षित होते ! - संपादक)
१० वीच्या भूगोलच्या पुस्तकातील नकाशातून अरुणाचल प्रदेश वगळण्यात आला आहे, यांसह अन्य काही चुकाही पुढे आल्या होत्या. महाराष्ट्र शासनाने हे पुस्तक रहित केले असून त्याचे पुनर्मुद्रण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

एका वर्षात मुंबई पोलिसांकडून २७१ जणांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक

मुंबई, २१ मे - जानेवारी २०१२ ते जानेवारी २०१३ या एका वर्षाच्या कालावधीत मुंबई पोलिसांनी २७१ जणांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली असून त्यांच्याकडून २९४ पिस्तुल आणि रायफल ही शस्त्रे आणि एकूण १ सहस्त्र ६८२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत, अशी माहिती पोलिसांनी एका  व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्ना्वर दिली आहे. 
या कारवाईमध्ये देशात बनवलेल्या पिस्तुलांसह परदेशातून चोरून आणलेल्या पिस्तुलांचाही समावेश आहे. एप्रिल २०१२ मध्ये सर्वाधिक ६०७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली, तर जानेवारी २०१३मध्ये सर्वाधिक ६७ बेकायदा शस्त्र जप्त करण्यात आली. या कारवाईमधून देशी बनावटीची शस्त्रे मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. याविषयी पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय म्हणाले, अशा प्रकारे बेकायदा शस्त्र बनवणार्यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, तसेच या शस्त्रांच्या सुट्या भागांच्या विक्रेत्यांचाही शोध चालू आहे. विशेष करून या धंद्यांचा उत्तरप्रदेशातील लोकांशी संबंध असल्याचे आढळून आले आहे.  (संदर्भ - टाइम्स ऑफ इंडिया)

फलक प्रसिद्धीकरता : हिंदूंनो, भगव्याचा द्वेष करणार्या राज्यकर्त्यांना ओळखा !

खालील मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
     केंद्रशासनाने स्वतःच्या कौतुकाच्या प्रसिद्धीसाठी बनवलेल्या दृकश्राव्य विज्ञापनात एक विद्यार्थिनी पांढरा, हिरवा आणि नारिंगी अशा तीन रंगांचा मिळून तिरंगा बनला आहे, असे सांगते. भगव्याऐवजी नारिंगी रंग सांगून केंद्रशासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे.

काश्मीरमध्ये सैनिकाकडून दोन सहकारी सैनिकांची गोळ्या झाडून हत्या

जम्मू, २१ मे - जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवाड शहरात २० मेच्या रात्री सशस्त्र  सीमा बल (एस्एस्बी)च्या विजय कुमार या सैनिकाने नरेंद्र सिंह आणि वीर सिंह या त्याच्या दोन सहकारी सैनिकांची ते झोपलेले असतांना गोळ्या झाडून हत्या केली, तर अन्य दोन जण घायाळ झाले. या सैनिकांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

भगतसिंह यांना निर्दोष घोषित करण्याची पाक नागरिकाची मागणी

जे एका पाकिस्तानी नागरिकाला वाटते ते एकाही भारतीय नागरिकाला का वाटले नाही ? 
  लाहोर - भारतीय क्रांतीकारक हुतात्मा भगतसिंह यांना ब्रिटिशांनी ख्रिस्ताब्द १९३१ मध्ये लाहोरमध्ये फाशी दिले होते; मात्र या विरोधात ८२ वर्षांनी पाकिस्तानात याचिका दाखल करण्यात आली आहे. इम्तीयाझ रशीद कुरेशी यांच्या सेव्ह द ज्युडीशरी कमिटीने लाहोरच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. 
भगतसिंह यांना शिक्षा देण्यात आली असली, तरी ते निर्दोष आहेत, भगतसिंह यांचे प्रकरण पुन्हा एकदा नव्याने पहाण्यात यावे. भगतसिंह हे एक क्रांतीकारक होते. ते निर्दोष असल्याचे उशिरा का होईना; परंतु न्यायालयाने घोषित करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. इम्तीयाझ कुरेशी म्हणतात, भगतसिंह यांना आधी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती; पण त्याची शिक्षा नंतर फाशीच्या शिक्षेत पालटण्यात आली. भगतसिंह यांना हत्येच्या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले होते. पाकिस्तानचे निर्माते महंमद अली जीना यांनीही त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून पाकिस्तानच्या संसदेत श्रद्धांजली वाहिली होती. भगतसिंह यांनी ख्रिस्ताब्द १९२९ मध्ये ब्रिटीश संसदेत दोन स्फोट केले होते. ते केवळ आवाज करण्यासाठी होते. त्या स्फोटांमुळे कोणालाही हानी पोहोचली नव्हती. ब्रिटीश अधिकार्यावर गोळ्या झाडल्याच्या बनावट प्रकरणी भगतसिंह यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

अभिनेत्री प्रियांका चोपडाच्या जीवनावर आधारित धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट !

राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणार्यांचा नव्हे, तर भोगवादी 
अभिनेत्रीच्या जीवनावर आधारित धडा पाठ्यपुस्तकात 
समाविष्ट करून विद्यार्थ्यांना नीतीहीन बनवणारे शिक्षण मंडळ !
        मुंबई - हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोपडा ही चक्क धड्याच्या रूपाने पाठ्यपुस्तकातून झळकणार आहे. (राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीही न करणार्या एका अभिनेत्रीच्या जीवनावरील धडा पाठ्यपुस्तकात देऊन शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना कसले धडे देत आहे ? पालकांनो, अशा प्रकारे तुमच्या मुलांना चंगळवादी बनवणार्यास शिक्षण मंडळाला हा धडा काढून टाकण्यास भाग पाडा ! - संपादक)
१. स्प्रिंग डेल्स ही शिक्षणक्षेत्रात काम करणार्या मान्यवर संस्थांपैकी एक संस्था आहे. या संस्थेला सीबीएस्सी बोर्डाची मान्यताही आहे, तसेच या संस्थेच्या परदेशातही अनेक शाखा आहेत. 
२. या संस्थेच्या प्रशासनाने प्रियांकाच्या जीवनावर आधारित एक धडा पाचवीच्या पाठ्यपुस्तकातून शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. (एखाद्या व्यक्तीविषयी धडा पाठ्यपुस्तकात अंतर्भूत करतांना समाजात प्रसिद्ध असणार्या व्यक्तीमत्त्वाचीच निवड केली  जाते का ? - संपादक)

चेन्नई येथे धर्मजागृती सत्संगाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सौ. उमा रविचंद्रन मार्गदर्शन करतांना
   चेन्नई - हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शनिवार, १८ मे २०१३ या दिवशी चेन्नईच्या पाणीगृह कल्याण मंडपामध्ये आयोजित केलेल्या धर्मजागृती सत्संगाला हिंदु धर्माभिमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर हिंदू जनजागृती समितीच्या कार्याची माहिती सांगणारी ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. त्यानंतर हिंदू जनजागृती समितीचे श्री. राधाकृष्णन् यांनी धर्मांतर आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी धर्मशिक्षणाविषयीची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. सौ. रागिणी प्रेमनाथ यांनी ध्वनीचित्र-चकतीमध्ये दाखवलेल्या नवीन वास्तूचे उद्घाटन, वाढदिवस इत्यादी कृतींची माहिती तामिळी भाषेमध्ये सांगितली. हिंदू जनजागृती समितीच्या समन्वयक सौ. उमा रविचंद्रन यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर हिंदु अधिवेशनाची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. शेवटी गटचर्चा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला ७० हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समितीचे श्री. बालसुब्रह्मण्यम् यांनी केले. 

प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या ९४ व्या जन्मोत्सवानिमित्त पुरस्कार प्रदान सोहळा

प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन
   ठाणे - प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या ९४ व्या जन्मोत्सवानिमित्त दादाजी आध्यात्मिक पुरस्कार प्रदान सोहळा आणि अनाथ मुले यांना वस्त्रदान वितरण समारंभ वैशाख  पौर्णिमा, शनिवार (२५ मे २०१३) या दिवशी दुपारी ४.३० वाजता प.पू. दादाजी वैशंपायननगर, दूधशीतकरण केंद्राच्या मागे, पाथर्डी रोड, शेवगाव, जिल्हा नगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
    सूर्यकन्या साधनाकुटी तरसाडा, सुरत, गुजरात येथील प.पू. सवितानंद स्वामी यांच्या शुभहस्ते श्रीक्षेत्र नाशिक येथील प.पू. शिवानंद सरस्वती महाराज यांना, तर प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या शुभहस्ते मुंबई येथील प.पू. चारुदत्त महाराज पुरोहित, डॉ. (सौ.) स्वरूपा कुर्डेकर आणि उगार येथील वि.भ.भा. बाबा नाईक यांना सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री. नरेंद्रजी घुले उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. चंद्रशेखरजी घुले हे आहेत.

धर्मांधांनी घडवून आणलेल्या दंगलीत ठार

झालेल्या पोलीस शिपायाच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य देण्याविषयी मागणी करावी लागते, हेच लज्जास्पद ! शासन स्वतःहून मुसलमानांना त्वरित साहाय्य करते, तर हिंदूंना मागणी करावी लागते !
    ११.८.२०१२ या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात धर्मांध मुसलमानांनी घडवलेल्या दंगलीत पोलीस शिपाई संतोष हांडे हे गंभीर घायाळ झाले. उपचारांअभावी त्यांचे नुकतेच निधन झाले. तरी हांडे यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक साहाय्य द्यावे, तसेच दंगलखोरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन देशभक्त पत्रकार संघाच्या वतीने सांगली येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. उत्तम पाटील यांना देण्यात आले.

एफ्.एच्.ए. (फोरम फॉर हिंदु अवेकनिंग)चा एप्रिल २०१३ चा प्रसार अहवाल


१. संकेतस्थळाच्या संदर्भातील सांख्यिक आढावा
१ अ. एप्रिल २०१३ पर्यंत विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

२. लेख
२ अ. संकेतस्थळावर एकूण ६४० लेख प्रसिद्ध करण्यात आले. एप्रिल २०१३ मध्ये एफ्.एच्.ए.च्या रिपोटर्स सेक्शनच्या अंतर्गत पुढील २ नवीन लेख प्रसिद्ध करण्यात आले.
१. अवर धार्मिक अ‍ॅक्टिव्हिटिज् टू अवेकन अ‍ॅण्ड युनाइट हिंदुज् वर्ल्डवाईड इन फेब्रुवारी २०१३ (फेब्रुवारी २०१३ या मासामध्ये विश्‍वभरातील हिंदूंना जागृत करून संघटित करण्यासाठी एफ्.एच्.ए.ने केलेले धार्मिक उपक्रम)
२. अवर धार्मिक अ‍ॅक्टिव्हिटिज् टू अवेकन अ‍ॅण्ड युनाइट हिंदुज् वर्ल्डवाईड इन मार्च २०१३ (मार्च २०१३ या मासामध्ये विश्‍वभरातील हिंदूंना जागृत करून संघटित करण्यासाठी एफ्.एच्.ए.ने केलेले धार्मिक उपक्रम)   
२ आ. संकेतस्थळावर एकूण ८६ वृत्तपर लेख (न्यूज आयटम्स) प्रसिद्ध करण्यात आले.

साधना : दैनंदिन धकाधकीचे जीवन आनंदी होण्यासाठी एक आश्‍वासक स्तंभ !


  मनुष्याच्या जीवनातील दुःखाच्या आध्यात्मिक कारणांवर मात केवळ साधनेच्या आधारेच करता येते. शास्त्रानुसार साधना का अन् कशी करावी, याचे मार्गदर्शन या सदरातून करण्यात येत आहे.
 अनुभूती
आपतत्त्वाची अनुभूती : सूक्ष्म-गोड रसाची चव अनुभवणे
अनुभूती - मार्गदर्शन ऐकतांना तोंड गोड होणे : सनातनच्या जेष्ठ साधिका पेठेआजी (सनातनच्या संत पू. पेठेआजी) यांचे मार्गदर्शन ऐकतांना अचानक माझे तोंड गोड झाले. आजी स्वतःच्या ७५ व्या वाढदिवसाची आठवण सांगतांना माझ्या सर्वांगावर रोमांच आले.
- श्री. सुनील पाटील, चाळीसगाव, जळगाव.
(क्रमश:)                   
(ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना शिकवणारी ग्रंथमालिका : खंड - साधना (सर्वसाधारण विवेचन आणि महत्त्व)
साधनाविषयक अधिक माहिती www.sanatan.org या संकेतस्थळावर उपलब्ध !

अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी संपर्क सेवा करणारे साधक आणि सनातन संस्थेचे जिल्हासेवक यांना सूचना

वृत्तवाहिन्या आणि केबलवाहिन्या यांद्वारे अधिवेशनाचे सुलभतेने प्रसारण व्हावे, यासाठी पुढील माहिती कळवा !
    गोवा येथे ६ ते १० जून २०१३ या कालावधीत होत असलेल्या द्वितीय अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी जिल्ह्यांतून संपर्क चालू आहेत. या संपर्काच्या वेळी अधिवेशनाला प्रसिद्धी देऊ इच्छिणार्‍या दृकश्राव्य माध्यमांना (वृत्तवाहिन्या, केबल इत्यादी) पुढील माहिती सविस्तरपणे विचारावी. संबंधितांना ई-मेलद्वारे लिंक पाठवून अधिवेशनाचे चित्रीकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प.पू. डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या आणि ईश्वरी ज्ञान असलेल्या अध्यात्मशास्त्राविषयीच्या ग्रंथांमध्ये वैज्ञानिक भाषेत का, कसे आणि टक्केवारी, दिली असल्याने ते ज्ञान सध्याच्या काळानुसार एकमेवाद्वितीय आहे !

वाचकाचा विचार 
     आपल्याला ईश्वराकडून मिळालेले ज्ञान एकमेवाद्वितीय आहे, अशा आविर्भावात सनातन संस्था अनेक ग्रंथ / लेख छापत असते; परंतु प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि व्यास महर्षी यांचा दृष्टीकोन काय दिसतो ? भगवंताने गीतेत हे ज्ञान सूर्याने वैवस्वत मनूला दिले इत्यादी परंपरा सांगितली आहे. व्यास महर्षींनी भागवतात अनेक ठिकाणी गहन प्रश्नांची उत्तरे देतांना असेच परंपरेचे दाखले दिले आहेत. त्यामुळे आपल्याला सुचलेला विचार एकमेवाद्वितीय इत्यादी काही नाही, अशी या महापुरुषांची धारणा दिसते. परंपरांमध्ये आपल्यासारख्या विचारांचा आधार सापडला, तर नवीन ग्रंथ छापण्याचा आटापिटा करण्याऐवजी पुनर्प्रकाशनाचे काम हातात रहाते. त्यामुळे पुष्कळ मोठी शक्ती आपण वाचवू शकता. तिचा विनियोग प्रसाराच्या अनेक नवीन शक्यतांसाठी आणि संघटनेच्या नवीन प्रारूपांसाठी आपण करू शकता. 
- एक वाचक, दैनिक सनातन प्रभात
 'सनातन संस्थेचे' स्पष्टीकरण  
      भारतातील हिंदू भाग्यवान आहेत. त्यांना वेद, दर्शने, स्मृति, रामायण, श्रीयोगवासिष्ठ, महाभारत, श्रीमद्भगवद्गीता, पुराणे असे अनेक ग्रंथ स्वतःच्या उन्नतीसाठी उपलब्ध आहेत; पण दुर्दैव म्हणजे, सध्या बहुतांश हिंदू स्वधर्माविषयी अतिशय उदासीन आहेत. त्यामुळे धर्मग्रंथांचे अध्ययन किंवा अध्यापन करणे, तर दूरच; पण धर्मग्रंथाच्या महत्त्वाविषयीही ते अनभिज्ञ आहेत.

समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय एकच आणि तो म्हणजे प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे

      आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पुढे जागतिक महायुद्धही होऊन कोट्यवधी मानव मरणार आहेत. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय सांगता येत नाहीत. तेव्हा प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे एवढेच आपल्या हातात असते. त्या काळात साधनारत राहिल्यासच येणाऱ्या  भीषण काळाला आपण तोंड देऊ शकू. तसे करता यावे; म्हणून आताच साधना वाढवणे आवश्यक आहे. 
- (प.पू.) डॉ. आठवले (चैत्र कृष्ण पक्ष ५, कलियुग वर्ष ५११५ (३०.४.२०१३))

मांत्रिकांनी आरसा आणि लादी यांवर सलग तीन दिवस हाताचे पंजे अन् वेगवेगळे आकार उमटवून आक्रमण करणे

मांत्रिकानी आरशावर आक्रमण करून उठवलेले हाताचे पंजे अन् वेगवेगळे आकार
 १. लादी आणि आरसा यांवर पंजे उमटणे, लादीवरील पंजे विभूती अन् गोमूत्र घालून पुसणे आणि रात्री झोपतांना लादीवर कापूर टाकणे: चैत्र कृष्ण पक्ष द्वितीया, कलियुग वर्ष ५११५ (२७.४.२०१३) या दिवशी लादी आणि आरसा यांवर अनेक पंजे उमटले होते. त्यांचे छायाचित्र काढणे कठीण होते; म्हणून साधक आरसा काढून घेऊन गेले आणि तो जतन-विभागात दिला. लादीवर उमटलेले सर्व पंजे आणि इतर आकार विभूती अन् गोमूत्र यांनी पुसले. रात्री झोपतांना नेहमीचे आध्यात्मिक उपाय केले. तसेच पूर्ण लादीवर कापूर टाकला होता. 
२. सकाळी उठल्यावर पाहिले असता रात्रभरात काहीही उमटलेले न दिसणे आणि दुपारपर्यंत खोलीतील लादी अन् आरसा यांवर हाताचे पंजे, तसेच इतर आकार उमटणे: चैत्र कृष्ण पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११५ (२८.४.२०१३) या दिवशी सकाळी उठल्यावर रात्रभरात काही उमटले आहे का ? हे आधी बघितले. मला विशेष काही दिसले नाही. काही वेळाने मी माझी मुलगी कु. गार्गी हिला सर्वत्र भ्रमणभाषच्या प्रकाशात बघायला सांगितले. दुपारपर्यंत आम्ही रहात असलेल्या खोलीत सलग तिसऱ्या दिवशीही मनुष्याच्या हाताचे आणि प्राण्याचे पंजे अन् इतर आकार उमटले होते. त्याविषयी पुढे देत आहे.

रामनाथी आश्रमात पू. अतुल दिघे रहात असलेल्या खोलीत हाताचे पंजे आणि आरशावर साधकाचे नाव उमटवण्याच्या माध्यमातून मांत्रिकांनी आक्रमण करणे

      मार्च २०१३ पासून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पाताळातील मांत्रिकांनी रक्ताच्या डागांच्या माध्यमातून आक्रमण करण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या दोन मासांमध्ये आपत्कालाच्या तीव्रतेनुसार रक्ताच्या डागांच्या माध्यमातून मांत्रिकांनी आश्रम, संत आणि साधक यांच्यावर केलेल्या आक्रमणांचा तपशील ८ मे ते ११ मे या कालावधीत पाहिला. आज आपण पू. अतुल दिघे रहात असलेल्या खोलीत मांत्रिकाने विविध माध्यमांतून केलेल्या आक्रमणांचा तपशील पाहूया.  

हस्तप्रक्षालनपात्रावरील आरशावर मोठ्या व्यक्तीच्या हाताचे उमटलेले दोनपंजे
१. चैत्र कृष्ण पक्ष प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११५ (२६.४.२०१३) 
१ अ. हस्तप्रक्षालनपात्रावरील आरशावर एका व्यक्तीच्या हाताचा पंजा उमटणे आणि मुलगी जवळ नसतांनाही तिच्या पैंजणांचा नाद ऐकू येणे : आम्ही रहात असलेल्या खोलीच्या हस्तप्रक्षालनपात्रावरील आरशावर दुपारी २ वाजता मोठ्या व्यक्तीच्या हाताच्या आकाराचा पंजा उमटला. त्याच रात्री ११.३० वाजता आणखीन काही डाग त्याच आरशाच्या दुसऱ्या  भागावर उमटले. मी कु. गार्गीला (मुलीला) सांगितले, एखाद्या साधकाला छायाचित्र काढण्यासाठी बोलव. ती साधकाला शोधण्यासाठी गेली. ती घालत असलेल्या पैंजणांतून घुंगरांचा नाद येतो. तसाच नाद ती खोलीत नसतांना मला येत होता. त्या वेळी वाटले, ती परत आली असेल. प्रत्यक्षात ती आली नव्हती. काही वेळाने ती खोलीत परत आल्यावर पैंजणांचा नाद अधून-मधून येत होता. तो तिलाही ऐकू आला. 

माध्यमांच्या सौंदर्यदृष्टीतील अश्लीलता !

       सध्या भारतात विविध मार्गाने होणाऱ्या  अश्लीलतेच्या प्रसारामुळे समाजात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. देहलीत धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर मोठा जनक्षोभ उसळल्याने राज्यकर्त्यांना त्याची दखल घ्यावी लागली आणि महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कठोर कायदा करणे त्यांना भाग पडले; मात्र कायदा केल्याने या समस्या सुटतील असे नाही. त्या कायद्यांच्या कठोर कार्यवाहीसह महिलांवर अत्याचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या विकृत मानसिकतेवर घाव घालणे आवश्यक आहे आणि त्याच दृष्टीने काही सुसंस्कृत महिला पुढे येतांना दिसत आहेत. मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सौ. रितू तावडे यांनी अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या  घटकांवर बंदी आणली जावी; म्हणून कपड्यांच्या दुकानाबाहेर महिलांचे अंतर्वस्त्र घालून उभे केलेल्या पुतळ्यांवर आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारच्या विज्ञापनातून अश्लीलता निर्माण करणारे हे पुतळे हाटवले जावेत, यासाठी त्यांनी महापालिकेच्या सभागृहात अशा पुतळ्यांवर बंदी आणण्याची मागणी केली. महापौर सुनील प्रभु यांनी त्यांची मागणी उचलून धरत पालिकाआयुक्तांकडे तशी सूचना केली. या समाजहिताच्या कार्याची दखल घेऊन सौ. तावडे यांचे कौतुक करायचे सोडून माध्यमांनी मात्र हे पुतळे हाटवून अश्लीलता संपणार आहे का ? अश्लीलता पुतळ्यात असते कि नजरेत ? असे फालतू प्रश्न उपस्थित केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn