काँग्रेसचे राज्यकर्ते, सैन्य, पोलीस आणि नागरी प्रशासन यांतील अधिकारी भ्रष्टाचार करून देशाच्या तिजोरीवर गेली सहा दशके दरोडा घालत आहेत. आता काँग्रेसच्या राज्यात गरीब स्थानिक महिलांना केवळ अन्नाच्या आमिषापोटी नग्न नाचवले जात आहे, ही गोष्ट प्रत्येक भारतियासाठी विशेषत्वाने हिंदूसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे.
अंदमानातील जारवा महिलांना अर्धनग्न नाचवल्याच्या आणखी २ ध्वनीचित्रफिती
अन्नासाठी महिलांना नग्न नाचायला लावणारे पोलीस भारतात असणे, हे काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी देश वासनांध बनवल्याचे द्योतक !
काँग्रेसचे राज्यकर्ते, सैन्य, पोलीस आणि नागरी प्रशासन यांतील अधिकारी भ्रष्टाचार करून देशाच्या तिजोरीवर गेली सहा दशके दरोडा घालत आहेत. आता काँग्रेसच्या राज्यात गरीब स्थानिक महिलांना केवळ अन्नाच्या आमिषापोटी नग्न नाचवले जात आहे, ही गोष्ट प्रत्येक भारतियासाठी विशेषत्वाने हिंदूसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे.
काँग्रेसचे राज्यकर्ते, सैन्य, पोलीस आणि नागरी प्रशासन यांतील अधिकारी भ्रष्टाचार करून देशाच्या तिजोरीवर गेली सहा दशके दरोडा घालत आहेत. आता काँग्रेसच्या राज्यात गरीब स्थानिक महिलांना केवळ अन्नाच्या आमिषापोटी नग्न नाचवले जात आहे, ही गोष्ट प्रत्येक भारतियासाठी विशेषत्वाने हिंदूसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे.
शासकीय कार्यालयात पूजा करू शकता - उच्च न्यायालय
चेन्नई - शासकीय कार्यालयात आयुधपूजा किंवा सरस्वती पूजा केल्याने निधर्मीवादाला ठेच पोहोचत नाही, असा निवाडा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. शासकीय कार्यालयात होणारे धार्मिक कार्यक्रम रहित करण्यात यावे, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. हे वृत्त ‘इंडियाटाईम्स’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.
इस्रोच्या माजी शास्त्रज्ञांवर ठपका
इस्रोतील घोटाळा !
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी - इस्रोचे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) माजी अध्यक्ष माधवन नायर यांच्यासह ३ वरिष्ठ वैज्ञानिकांना अँथ्रिक्स-देवास व्यवहारात दक्षता आयोगाचे माजी आयुक्त प्रत्युष सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या इस्रोच्या एका चौकशी समितीने दोषी ठरवले आहे. अँथ्रिक्स-देवास व्यवहारात पारदर्शकता नव्हती, असा ठपका या समितीने ठेवला आहे. या चौघांना कोणतेही सरकारी पद देण्याविषयी आधीच बंदी घालण्यात आलेली आहे. अँथ्रिक्स ही इस्रोची व्यावसायिक संस्था असून देवास हे एक आंतरराष्ट्रीय खासगी आस्थापन आहे.
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी - इस्रोचे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) माजी अध्यक्ष माधवन नायर यांच्यासह ३ वरिष्ठ वैज्ञानिकांना अँथ्रिक्स-देवास व्यवहारात दक्षता आयोगाचे माजी आयुक्त प्रत्युष सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या इस्रोच्या एका चौकशी समितीने दोषी ठरवले आहे. अँथ्रिक्स-देवास व्यवहारात पारदर्शकता नव्हती, असा ठपका या समितीने ठेवला आहे. या चौघांना कोणतेही सरकारी पद देण्याविषयी आधीच बंदी घालण्यात आलेली आहे. अँथ्रिक्स ही इस्रोची व्यावसायिक संस्था असून देवास हे एक आंतरराष्ट्रीय खासगी आस्थापन आहे.
साधकांनो, निधर्मी राज्यकर्ते आणि सुरक्षायंत्रणा यांच्या छळाला सामोरे जाण्यास सिद्ध व्हा !
सनातनची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पुनर्चौकशी चालू !
कर्नाटकात साप्ताहिक सनातन प्रभातच्या कार्यालयात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी
मंगळुरू - मंगळुरू येथील साप्ताहिक सनातन प्रभातच्या कार्यालयात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या दोन अधिकार्यांनी चौकशी केली. हे अधिकारी सकाळी ११ वाजता दोन स्थानिक पोलीस अधिकार्यांसह आले होते. हे अधिकारी मडगाव स्फोट प्रकरणातील एका संशयिताची चौकशी करून संस्थेला पैसा कोठून मिळतो, तुमचे नेमके कार्य काय चालते, तुमचे प्रमुख कोण असे प्रश्न विचारले.
कर्नाटकात साप्ताहिक सनातन प्रभातच्या कार्यालयात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी
मंगळुरू - मंगळुरू येथील साप्ताहिक सनातन प्रभातच्या कार्यालयात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या दोन अधिकार्यांनी चौकशी केली. हे अधिकारी सकाळी ११ वाजता दोन स्थानिक पोलीस अधिकार्यांसह आले होते. हे अधिकारी मडगाव स्फोट प्रकरणातील एका संशयिताची चौकशी करून संस्थेला पैसा कोठून मिळतो, तुमचे नेमके कार्य काय चालते, तुमचे प्रमुख कोण असे प्रश्न विचारले.
शिष्यवृत्तीच्या नावाखाली अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना १७ कोटी रुपयांची खैरात !
चालू आर्थिक वर्षात ७२ कोटी ६८ लक्ष रुपयांची तरतूद !
मुंबई, ५ फेब्रुवारी (वार्ता.) - राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्च व्यावसायिक आणि इयत्ता १२ वी नंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत अन् गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्ती योजनेसाठी तंत्र शिक्षण संचालनालयाला १५ कोटी रुपये, तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला २ कोटी १ लक्ष रुपये, असे एकूण १७ कोटी १ लक्ष रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे अल्पसंख्यांक विकास विभागाच्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.
मुंबई, ५ फेब्रुवारी (वार्ता.) - राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्च व्यावसायिक आणि इयत्ता १२ वी नंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत अन् गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्ती योजनेसाठी तंत्र शिक्षण संचालनालयाला १५ कोटी रुपये, तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला २ कोटी १ लक्ष रुपये, असे एकूण १७ कोटी १ लक्ष रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे अल्पसंख्यांक विकास विभागाच्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.
आयएस्आयचा हेर असणार्या पोलीस अधिकार्यास जम्मूमध्ये अटक
पाकच्या गुप्तचरांनी पोखरलेला भारत !
जम्मू, ५ फेब्रुवारी - जम्मू-काश्मीर पोलीस खात्यात विशेष पोलीस अधिकारी पदावर असलेल्या एका अधिकार्याला आयएस्आय या पाकच्या गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद रफी असे नाव असलेला हा देशद्रोही अधिकारी गेली नऊ वर्षे भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करत पाकसाठी हेरगिरी करत होता.
जम्मू, ५ फेब्रुवारी - जम्मू-काश्मीर पोलीस खात्यात विशेष पोलीस अधिकारी पदावर असलेल्या एका अधिकार्याला आयएस्आय या पाकच्या गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद रफी असे नाव असलेला हा देशद्रोही अधिकारी गेली नऊ वर्षे भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करत पाकसाठी हेरगिरी करत होता.
कुपोषित बालकांच्या संख्येत घट
मुंबई - मेळघाटातील कुपोषणाची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्यानंतर वर्षभरात तेथील परिस्थितीत सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ सहस्र ५०० कुपोषित बालकांच्या संख्येत घट होऊन यंदा हा आकडा ११ सहस्र १९६ वर स्थिरावला आहे. (न्यायालयाच्या आदेशानंतरच राज्यकर्ते आणि प्रशासन जनतेची काळजी घेणार असतील, तर न्यायालयाच्याच हाती सत्ता का सोपवू नये ! - संपादक)
तामिळनाडूमधील श्री अगस्तियार मंदिर शासनाच्या नियंत्रणात
हिंदूंनो, एखादी मशीद अथवा चर्च यांचे सरकारीकरण झाल्याची बातमी कधीच येत नाही, हे लक्षात घ्या !
हिंदूंनो, तुमची मंदिरे तुमच्यातील भक्तांच्या नव्हे, तर आसुरी वृत्तीच्या राज्यकर्त्यांच्या कह्यात जातात, हे तुम्हाला लांछनास्पद !
हिंदूंनो, तुमची मंदिरे तुमच्यातील भक्तांच्या नव्हे, तर आसुरी वृत्तीच्या राज्यकर्त्यांच्या कह्यात जातात, हे तुम्हाला लांछनास्पद !
चेन्नई - तामिळनाडूच्या ‘टी नगर’ येथील श्री अगस्तियार मंदिर राज्य शासनाच्या मंदिर व्यवस्थापन खात्याच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे. या मंदिराच्या खाजगी व्यवस्थापनाने मंदिर स्वतःकडे राखण्यासाठी ४० वर्षे न्यायालयीन लढा दिला.
दिल्ली येथील हिंदुद्वष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन रहित !
हिंदु जनजागृती समितीच्या विरोधाचा परिणाम !
या यशाबद्दल ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
मुंबई, ५ फेबु्रवारी (वार्ता.) - नवी दिल्ली येथील हिवाळी महोत्सवानिमित्त ‘मास्टर्स स्ट्रोक’ या नावाने ‘आर्ट इलेमेंटस् गॅलरी, दिल्ली’ येथे नामांकित चित्रकारांसह हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री २९ फेब्रुवारीपर्यंत भरवण्यात येणार होते. या चित्रप्रदर्शनातील हुसेन यांच्या चित्रांना हिंदु जनजागृती समितीने विरोध केल्यावर या कलादालनाकडून हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री करणार नसल्याचे सांगण्यात आले.
या यशाबद्दल ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
मुंबई, ५ फेबु्रवारी (वार्ता.) - नवी दिल्ली येथील हिवाळी महोत्सवानिमित्त ‘मास्टर्स स्ट्रोक’ या नावाने ‘आर्ट इलेमेंटस् गॅलरी, दिल्ली’ येथे नामांकित चित्रकारांसह हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री २९ फेब्रुवारीपर्यंत भरवण्यात येणार होते. या चित्रप्रदर्शनातील हुसेन यांच्या चित्रांना हिंदु जनजागृती समितीने विरोध केल्यावर या कलादालनाकडून हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री करणार नसल्याचे सांगण्यात आले.
मुंबईतील सार्वजनिक गणेशमूर्ती बनवण्यावर १८ फूट उंचीचे बंधन
घरगुती मूर्ती दीड फुटाची, तर सार्वजनिक मूर्ती अधिकाधिक ५ फुटांपर्यंत असावी, असे गेल्या एक दशकांपासून सनातन संस्था सांगत आहे. मोठ्या मूर्तींच्या हव्यासामुळे श्री गणेशाची कृपा होण्याऐवजी त्याची विटंबनाच अधिक होते, असेच प्रतिवर्षी निदर्शनास येते. विसर्जनाच्या वेळी मूर्तींची विटंबना अधिक लक्षात येते. त्यामुळे गणेशभक्तांनी १८ नव्हे, तर ५ फुटांच्या मूर्ती बनवण्यासाठी मूर्तीकारांवर आणि गणेश मंडळांवर दबाव निर्माण करायला हवा ! - संपादक
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे स्थान अबाधित असेल !
फ.मु. शिंदे यांच्याकडून संत साहित्याचा गुणगौरव
चंद्रपूर, ५ फेब्रुवारी (वार्ता.) - सध्याच्या साहित्यिकांना प्रसिद्धीची प्रचंड घाई लागली आहे. ज्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच असते. आजवर केवळ संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे दोनच तत्त्वज्ञ झाले आहेत. त्यांची जागा अन्य कोणीही घेऊ शकणार नाही.
चंद्रपूर, ५ फेब्रुवारी (वार्ता.) - सध्याच्या साहित्यिकांना प्रसिद्धीची प्रचंड घाई लागली आहे. ज्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच असते. आजवर केवळ संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे दोनच तत्त्वज्ञ झाले आहेत. त्यांची जागा अन्य कोणीही घेऊ शकणार नाही.
ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या महाविद्यालयाकडून ‘आधुनिक रामायणा’चे प्रदर्शन रहित
हिंदूंनो, या यशाबद्दल श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचे परिणाम !
ठाणे, ५ फेब्रुवारी - येथील ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात ‘आधुनिक रामायण’ हे नाटक सादर करण्यात येणार होते. हिंदु जनजागृती समतीच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्रबोधनानंतर हे नाटक रहित करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचे परिणाम !
ठाणे, ५ फेब्रुवारी - येथील ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात ‘आधुनिक रामायण’ हे नाटक सादर करण्यात येणार होते. हिंदु जनजागृती समतीच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्रबोधनानंतर हे नाटक रहित करण्यात आले.
फलक प्रसिद्धीकरता : लोकहो, निधर्मी राज्यात गरीब महिलांचे होणारे शोषण जाणा !
टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
भारतातील अंदमानमधील वनवासी महिलांना अन्नाच्या आमिषापोटी पोलिसांच्या साहाय्याने अर्धनग्न अवस्थेत विदेशी पर्यटकांसमोर नाच करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आल्याच्या दोन ध्वनीचित्र-फिती ब्रिटनमधील प्रसिद्ध ‘ऑब्जर्व्हर’ या नियतकालिकाने प्रसारित केल्या आहेत.
भारतातील अंदमानमधील वनवासी महिलांना अन्नाच्या आमिषापोटी पोलिसांच्या साहाय्याने अर्धनग्न अवस्थेत विदेशी पर्यटकांसमोर नाच करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आल्याच्या दोन ध्वनीचित्र-फिती ब्रिटनमधील प्रसिद्ध ‘ऑब्जर्व्हर’ या नियतकालिकाने प्रसारित केल्या आहेत.
साधकांना सूचना : हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छापत्रके उपलब्ध !
चैत्र शु. प्रतिपदा कलियुग वर्षे ५११४ (२३ मार्च २०१२) या दिवशी हिंदु नववर्षाचा प्रारंभ होत आहे. या शुभदिनी समस्त हिंदूंनी एकमेकांना हिंदु धर्माची महती सांगणारी आणि धर्मप्रेम वृद्धीगंत करणारे विचार प्रसुत करणारी शुभेच्छापत्रके पाठवल्यास हिंदूंची ही कृती हिंदुराष्ट्राच्या उभारणीस साहाय्यभूत अशी होऊ शकते.
उच्च न्यायालयाच्या निर्णयावर उथळपणाची वक्तव्ये करणे राज ठाकरे यांना अशोभनीय !
ज्येष्ठ विधीज्ञांच्या प्रतिक्रिया
मुंबई, ५ फेब्रुवारी (वार्ता.) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘आम्ही रस्त्यावर सभा घेऊ, कोणाला किती खटले भरायचे तेवढे भरावेत’, असे वक्तव्य केले. ठाकरे यांच्या या वक्तव्याने विधीक्षेत्रात चांगलेच पडसाद उमटले आहेत.
मुंबई, ५ फेब्रुवारी (वार्ता.) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘आम्ही रस्त्यावर सभा घेऊ, कोणाला किती खटले भरायचे तेवढे भरावेत’, असे वक्तव्य केले. ठाकरे यांच्या या वक्तव्याने विधीक्षेत्रात चांगलेच पडसाद उमटले आहेत.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या जोरदार घटना
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
लोकहो, राजकारणात दोन्ही काँग्रेस पक्षांत गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याने अशा मारामारी करणार्या उमेदवारांना तुम्ही निवडून देण्यापेक्षा कायमचे घरी पाठवा !
कोल्हापूर, ५ फेबु्रवारी (वार्ता.) - राज्यात ठिकठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे.
लोकहो, राजकारणात दोन्ही काँग्रेस पक्षांत गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याने अशा मारामारी करणार्या उमेदवारांना तुम्ही निवडून देण्यापेक्षा कायमचे घरी पाठवा !
कोल्हापूर, ५ फेबु्रवारी (वार्ता.) - राज्यात ठिकठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे.
नवी मुंबईत साक्षरतेचे प्रमाण अधिक असूनही सिग्नल तोडण्याचे प्रमाण अधिक – राऊत
नवी मुंबई, ५ फेब्रुवारी – नवी मुंबईत साक्षरतेचे प्रमाण अधिक असूनही सिग्नल तोडण्याचे प्रमाण अधिक असल्याची खंत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी वाशी येथे व्यक्त केली. नवी मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. वाशीतील फोर्टीज हिरानंदानी रुग्णालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
शिवसेनेची सर्वाधिक तरुण उमेदवार कु. अनुशा हिला धारावी स्वच्छ बनवायची आहे !
मुंबई महापालिका निवडणूक २०१२
मुंबई, ५ फेब्रुवारी - मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता रंग घेऊ लागली आहे. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू लागले असतांना यात धारावी येथील शिवसेनेची सर्वाधिक तरुण उमेदवार कु. अनुशा वालप्दासी हिची चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे.
मुंबई, ५ फेब्रुवारी - मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता रंग घेऊ लागली आहे. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू लागले असतांना यात धारावी येथील शिवसेनेची सर्वाधिक तरुण उमेदवार कु. अनुशा वालप्दासी हिची चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षांच्या पारदर्शकतेविषयी जनमानसांत उदासीनता
मुंबई, ५ फेब्रुवारी - राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अधिकाधिक पारदर्शक व्हाव्यात, याकरता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सूचना मागितल्या होत्या. मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत केवळ सात जणांनी सूचना पाठवल्याने मंडळाची घोर निराशा झाली आहे.
ममुराबाद (जिल्हा जळगाव) ग्रामपंचायतीत बिअरबारचा प्रस्ताव अवैधपणे अंतर्भूत केल्याचे उघड
ममुराबाद (जिल्हा जळगाव), ५ फेब्रुवारी - गांधीजयंतीचे औचित्त्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने सदस्यांच्या बैठकीचे आयोजन ३ ऑक्टोबर २०११ या दिवशी करण्यात आले होते. गांधीजींना मानवंदना दिल्यानंतर गावाच्या विकासासाठी काही ठराव नेहमीप्रमाणे संमत करण्यात आले.
भ्रष्ट सुरेश कलमाडी यांचे पुण्यात वाजत-गाजत स्वागत
भ्रष्टाचारीच आज देशातील तरुणांसमोर आदर्श ठरत आहेत, असे नुकतेच ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायणमूर्ती यांनी म्हटले होते, तेच पुण्यातील कलमाडी समर्थकांनी दाखवून दिले. यातून भारतीय लोकशाहीची निरथर्कताच स्पष्ट होते. ही स्थिती पालण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकूण २ सहस्र २३३ उमेदवार रिंगणात
मुंबई, ५ फेब्रुवारी (वार्ता.) - मुंबई महापालिकेसाठी गुरुवार, १६ फेब्रुवारी या दिवशी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ३ सहस्रांहून अधिक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यानंतर ४ फेबु्रवारी या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे आता एकूण २ सहस्र २३३ उमेदवार रिंगणात आहेत.
चूक नव्हे, तर बुद्धीची प्रगल्भता दर्शवणारे आधुनिक वैद्य वसंत आठवले यांचे दोन लेख आधुनिक वैद्य वसंत आठवले
![]() |
| आधुनिक वैद्य वसंत आठवले |
‘एका साधिकेला पूर्णवेळ साधना करण्यास घरातून विरोध होणे, आई-वडिलांसमवेत ती रामनाथी आश्रमात येणे, त्या वेळी वडिलांना प.पू. डॉक्टरांच्या ठिकाणी भगवान विष्णूचे दर्शन होऊन त्यांनी मुलीला आश्रमात राहून साधना करण्याची अनुमती देणे, याविषयीचे लिखाण ती. अप्पाकाकांनी ‘श्रीविष्णूच्या दर्शनामुळे प.पू. डॉक्टरांच्या ईश्वरस्वरूपाची आलेली प्रचीती’ या मथळ्यांतर्गत नोव्हेंबर २०११ मध्ये लिहून दिले होते.
आपत्काळात साधकांप्रतीची जवळीक भावनेच्या नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावर असायला हवी, हे देवाने आधीच प्रसंग घडवून शिकवणे
१. सहकारी दुसरीकडे रहाण्यास गेल्यावर निरुत्साही वाटणे आणि त्यांच्याप्रती जवळीक निर्माण झाल्याने निराशा येणे
‘गेल्या ७-८ मासांपासून मी आणि अन्य दोन सहकारी एकाच माळ्यावर रहात होतो. पौष कृ. दशमी, कलियुग वर्ष ५११३ (१८.१.२०१२) या दिवशी अचानक झालेल्या पालटामुळे वीरू आणि गणेश यांना तळमजल्यावर रहाण्यास जावे लागले. त्यामुळे मी रहात असलेल्या माळ्यावर अन्य कोणीही सहकारी नव्हते. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर मला निरुत्साही वाटू लागले.
समाज अन् राष्ट्र यांविषयीचे कर्तव्य विसरलेले आजचे लेखक, साहित्यिक आणि पत्रकार !
साहित्य संमेलानाच्या निमित्ताने...
१. समाजाला जागृत करण्याचे आणि समाजाच्या संवेदनांना शब्दरूप देण्याचे काम लेखकाचे असून हेच त्याचे समाजाशी असलेले नाते असणे : ‘कितीही ‘पत्रकार दिवस’ किंवा ‘साहित्य संमेलने’ साजरी केली, तरी सत्य हेच आहे की, साहित्यिक किंवा पत्रकार यांच्या भावना संवेदनशील प्रश्नांसाठी मृत झाल्या आहेत. वास्तविक विचार केला, तर त्यांचे लिखाण समाजाला जागृत करणारे असायला हवे.
१. समाजाला जागृत करण्याचे आणि समाजाच्या संवेदनांना शब्दरूप देण्याचे काम लेखकाचे असून हेच त्याचे समाजाशी असलेले नाते असणे : ‘कितीही ‘पत्रकार दिवस’ किंवा ‘साहित्य संमेलने’ साजरी केली, तरी सत्य हेच आहे की, साहित्यिक किंवा पत्रकार यांच्या भावना संवेदनशील प्रश्नांसाठी मृत झाल्या आहेत. वास्तविक विचार केला, तर त्यांचे लिखाण समाजाला जागृत करणारे असायला हवे.
धर्र्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने मंदबुद्धी विद्यालयात खाऊवाटप
अमरावती - प्रजासत्ताकदिनाचे औचित्त्य साधून धर्मप्रचार सभा
न्यासाच्या वतीने येथील हर्षराज मंदबुद्धी विद्यालयातील विद्यार्थ्यांना
खाउâवाटप करण्यात आले. शाळेतील ५० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
विद्यालयाचे अध्यक्ष श्री. देशमुख, अमरसन्स आस्थापनाचे श्री. अमर लुल्ला
आणि धर्मप्रचार सभा न्यासाच्या सौ. स्मिता ठाकरे या प्रसंगी उपस्थित होते. श्री. अमर लुल्ला यांनी या उपक्रमासाठी आर्थिक साहाय्य केले. त्यांनी आणि
श्री. देशमुख यांनी न्यासाच्या या कार्याचे विशेष कौतुक केले.
सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने लासलगाव येथे हळदी-कुंकू समारंभ
लासलगाव - सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत सभागृह येथे नुकताच हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेचे श्री. शिवाजी उगले यांनी उपस्थित २५ महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी सात्त्विक वाणाचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, हल्ली वाण म्हणून प्लास्टिकच्या वस्तू, खेळणी, स्टिलची भांडी, सौंदर्यप्रसाधने वाटली जातात.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
‘सनातन संस्थे’च्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने सार्वजनिक
ठिकाणी प्रबोधनासाठी लावण्याकरता सिद्ध केलेले प्रसारसहित्य नेहमीच्या
संगणकीय ठिकाणावर उपलब्ध केले आहे.
१. शिवोपासनेतील कृतींमागील अध्यात्मशास्त्र सांगणारे ‘ए-४’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक
२. सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा २.२५ फूट ² ३ फूट आकारातील फलक (यांसाठी प्रायोजक मिळवून ते सार्वजनिक ठिकाणी लावावेत.)
१. शिवोपासनेतील कृतींमागील अध्यात्मशास्त्र सांगणारे ‘ए-४’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक
२. सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा २.२५ फूट ² ३ फूट आकारातील फलक (यांसाठी प्रायोजक मिळवून ते सार्वजनिक ठिकाणी लावावेत.)
सनातनच्या मराठी भाषेतील ज्ञानसंपदेचे हिंदी, इंग्रजी आणि अन्य भारतीय, तसेच विदेशी भाषांमधे भाषांतर करण्याच्या सेवेची सुवर्णसंधी !
‘सनातन'ची सर्व अमूल्य ज्ञानसंपदा मुळात मराठी भाषेत आणि काही प्रमाणात
हिंदी आणि इंग्रजी भाषांत उपलब्ध आहे. या ज्ञानसंपदेचे हिंदी आणि
इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांत, तसेच विदेशी भाषांमधे (प्राधान्याने फ्रेंच, पोर्तुगिज, रशियन, इटालियन, जर्मन, स्पॅनिश) भाषांतर करणे आणि
भाषांतरित लिखाण पडताळणे, या सेवा करण्याची संधी उपलब्ध आहे. सहस्रावधी
ग्रंथ होतील, इतका पृथ्वीवर आजपर्यंत उपलब्ध नसलेला अमूल्य ज्ञानसाठा
भाषांतरित करायचा आहे.
साधकांना सूचना
कार्यकर्त्यांनी अडचणी मांडण्यापेक्षा शिकण्याच्या भूमिकेत राहून चांगला कार्यकर्ता बनण्याचा प्रयत्न करावा !
अ. ज्या जिल्ह्यांमध्ये शुद्धीकरण प्रक्रिया चालू आहे, त्या शुद्धीकरण प्रक्रियेच्या सत्संगांना कार्यकर्ते, चांगले कार्यकर्ते आणि साधक यांनी उपस्थित रहावे. चांगले कार्यकर्ते आणि साधक यांना पुढे बसवून कार्यकर्त्यांना त्यांच्या मागे थोडे अंतर ठेवून बसवावे.
आ. या सत्संगात चांगले कार्यकर्ते आणि साधक यांनीच प्रसंग, प्रश्न किंवा अडचणी मांडाव्यात. ते त्यांच्या गटातील साधकांविषयी (चांगले कार्यकर्ते अन् साधक) तसेच कार्यकर्ते यांच्या संदर्भातील अडचणी मांडू शकतात.
इ. कार्यकर्त्यांनी मात्र या सत्संगात अडचणी मांडू नयेत. त्यांनी या सत्संगात शिकण्याच्या भूमिकेत राहून स्वतःला चांगला कार्यकर्ता किंवा साधक यांच्यासारखे बनण्यासाठी प्रयत्न करावे. या सत्संगात त्यांना शिकण्याच्या दृष्टीने बसता येईल.
- श्री. (पू.) राजेंद्र शिंदे
अ. ज्या जिल्ह्यांमध्ये शुद्धीकरण प्रक्रिया चालू आहे, त्या शुद्धीकरण प्रक्रियेच्या सत्संगांना कार्यकर्ते, चांगले कार्यकर्ते आणि साधक यांनी उपस्थित रहावे. चांगले कार्यकर्ते आणि साधक यांना पुढे बसवून कार्यकर्त्यांना त्यांच्या मागे थोडे अंतर ठेवून बसवावे.
आ. या सत्संगात चांगले कार्यकर्ते आणि साधक यांनीच प्रसंग, प्रश्न किंवा अडचणी मांडाव्यात. ते त्यांच्या गटातील साधकांविषयी (चांगले कार्यकर्ते अन् साधक) तसेच कार्यकर्ते यांच्या संदर्भातील अडचणी मांडू शकतात.
इ. कार्यकर्त्यांनी मात्र या सत्संगात अडचणी मांडू नयेत. त्यांनी या सत्संगात शिकण्याच्या भूमिकेत राहून स्वतःला चांगला कार्यकर्ता किंवा साधक यांच्यासारखे बनण्यासाठी प्रयत्न करावे. या सत्संगात त्यांना शिकण्याच्या दृष्टीने बसता येईल.
- श्री. (पू.) राजेंद्र शिंदे
प.पू. डॉक्टरांना गुरुभावात रहाणे न आवडण्याची कारणे
‘कोणी मला ‘गुरु’ म्हटले, तर कसेसेच होते. मी लगेच अंगावर पाल पडल्याप्रमाणे ते झिडकारून टाकतो. इतर संतांप्रमाणे माझ्या नावे गुरुपौर्णिमा साजरी होत नाही. माझ्या अशा विचाराच्या संदर्भात मला पुढीलप्रमाणे वाटते.
१. ‘शिष्यभावात जास्त आनंद असतो; म्हणून मी शिष्यभाव सोडून गुरुभावात येऊ इच्छित नाही.
१. ‘शिष्यभावात जास्त आनंद असतो; म्हणून मी शिष्यभाव सोडून गुरुभावात येऊ इच्छित नाही.
साधकांना सूचना
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना, तसेच या तिथींच्या दोन दिवस आधी
अन् दोन दिवस नंतर वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात होत असल्याने
प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ : माघ पौर्णिमा (७.२.२०१२) पहाटे ४.४६ वाजता
समाप्ती : माघ पौर्णिमा (७.२.२०१२) उत्तरात्री ३.२३ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.
प्रारंभ : माघ पौर्णिमा (७.२.२०१२) पहाटे ४.४६ वाजता
समाप्ती : माघ पौर्णिमा (७.२.२०१२) उत्तरात्री ३.२३ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.
भारताची सत्य परिस्थिती कथन करणारा विनोदात्मक लघुसंदेश !
‘लघुसंदेशाच्या माध्यमातून विश्वभरात काही विनोद पाठवले जातात. त्यातून भारताचे हसे कसे होते, याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
अमेरिका : आमची कुत्री फुटबॉल खेळतात.
जपान : आमचे मासे नृत्य करतात.
चीन : आमचे हत्ती सायकल चालवतात.
भारत : आमची गाढवे देश चालवत आहेत !’
(संदर्भ : दैनिक ‘सामना’, ७ ऑगस्ट २०११)
अमेरिका : आमची कुत्री फुटबॉल खेळतात.
जपान : आमचे मासे नृत्य करतात.
चीन : आमचे हत्ती सायकल चालवतात.
भारत : आमची गाढवे देश चालवत आहेत !’
(संदर्भ : दैनिक ‘सामना’, ७ ऑगस्ट २०११)
पूर्णवेळ साधक कोणाला म्हणावे ?
१. ‘सेवाकेंद्रात, आश्रमात किंवा प्रसारात राहून सेवा करणारा
२. नुसती सेवा न करता सतत २४ घंटे ईश्वराच्या अनुसंधानात रहाणारा
३. प्रत्येक कृती साधना म्हणून करणारा
४. प्रत्येक क्षणी शिकण्याच्या भूमिकेत रहाणारा
५. ‘मला केवळ भगवंतच पाहिजे. त्यासाठी मी काय करू शकतो’, अशी तळमळ असलेला
६. कुठेही राहून सतत साधना करणारा
हे सर्व गुण असलेला खरा पूर्णवेळ साधक होय.’
- श्री. चेतन हरिहर, बेंगळुरू
२. नुसती सेवा न करता सतत २४ घंटे ईश्वराच्या अनुसंधानात रहाणारा
३. प्रत्येक कृती साधना म्हणून करणारा
४. प्रत्येक क्षणी शिकण्याच्या भूमिकेत रहाणारा
५. ‘मला केवळ भगवंतच पाहिजे. त्यासाठी मी काय करू शकतो’, अशी तळमळ असलेला
६. कुठेही राहून सतत साधना करणारा
हे सर्व गुण असलेला खरा पूर्णवेळ साधक होय.’
- श्री. चेतन हरिहर, बेंगळुरू
हिंदूंनो, संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !
‘सद्यस्थितीत राष्ट्र आणि धर्म यांवर चोहोबाजूंनी आघात होत असतांना बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना केला तर केवळ तत्कालीक निषेध व्यक्त करण्यापलीकडे काही कृती करत नाहीत. हिंदु धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्मरक्षणासाठी प्रवृत्त करणारी एकही संघटना नाही. त्यामुळे धर्मप्रेमींनो, एखादी संघटना येऊन आपल्यावर होणार्या आघातांपासून आपले रक्षण करेल, अशा भ्रमात न रहाता स्वतः संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !’
- डॉ. आठवले (पौष शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (२५.१२.२०११))
- डॉ. आठवले (पौष शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (२५.१२.२०११))
`एस्.एस्.आर्.एफ्.’चे संकेतस्थळ भ्रमणभाषवर घेण्याच्या प्रकल्पाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
![]() |
| श्री. रोहन मेहता |
शास्त्रज्ञांचाही घोटाळा !
पी. चिदंबरम यांना सहआरोपी बनवण्याची मागणी करणारी डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली, तर काल राष्ट्रकुल स्पर्धेतील सहस्रो कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी जामिनावर सुटका झालेल्या सुरेश कलमाडी यांचे काल पुण्यात सहस्रो समर्थकांनी वाजत-गाजत स्वागत केले.
Subscribe to:
Posts (Atom)













